वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा.

खासदार प्रतिभाताईंनी बिरसा मुंडा प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली; वरोरा येथे ऐतिहासिक रॅलीचे आयोजन.

जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा.

वरोरा, ९ ऑगस्ट २०२५ 
चेतन लूतडे वरोरा 

आज वरोरा येथे खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी आदिवासी जननायक व स्वातंत्र्यसैनिक भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वंदन केले. यानंतर त्यांनी भव्य रॅलीत सहभागी होऊन सामाजिक एकात्मतेचा ऐतिहासिक कार्यक्रम पाहण्यासाठी उपस्थित राहिल्या.  
रॅलीदरम्यान "एकता, सामाजिक बांधिलकी आणि जनजागृती" या संदेशावर भर देण्यात आला. वरोऱ्यातील सर्व वयोगटातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच युवक-युवतींनी उत्साहात सहभाग दर्शविल्यामुळे संपूर्ण परिसर उत्सवमय वातावरणाने गजबजला. सामूहिक घोषणा, राष्ट्रगीत गायन आणि बिरसा मुंड्यांच्या विचारांचे पॅनेल्स यामुळे कार्यक्रम प्रेरणादायी ठरला.  

खासदार धानोरकर यांनी जोर देऊन सांगितले,  
"बिरसा मुंडांसारख्या वीरांनी लढलेल्या संघर्षाचा आणि त्यांनी दाखवलेले समाजसेवेचे आदर्श आपल्या पिढ्यांपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे. अशा कार्यक्रमांमुळे इतिहासाचा गौरव तर होतोच, शिवाय नवीन पिढीत राष्ट्रप्रेमाची ज्योत पेटते."

या प्रसंगी  आदिवासी टायगर  सेना जिल्हाप्रमुख  शुभम टोरे व सामाजिक कार्यकर्ते मुकेश चांदेकर यांनी आदिवासी जागतिक दिनानिमित्त रॅलीचे आयोजन केले होते. शैक्षणिक संस्था तसेच आदिवासी समुदायाचे प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात हजर होते.

Comments