वाढत्या उन्हामुळे शाळा - महाविद्यालये सकाळच्या सत्रात 11 वाजेपर्यंतच ठेवाØ जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी निर्गमित केले आदेश

वाढत्या उन्हामुळे शाळा - महाविद्यालये सकाळच्या सत्रात 11 वाजेपर्यंतच ठेवा  जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी निर्गमित केले आदेश चंद्रपूर, दि. 19 : जिल्ह्यात सध्या वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 11 मार्च 2026 रोजी आयोजित बैठकीत शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद यांना शाळा सकाळ सत्रात घेण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाचा तीव्र तडाखा जाणवत असून तापमान 44 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः उष्माघात (सन स्ट्रोक) व इतर उष्णतेशी संबंधित आजारांचा धोका लक्षात घेता विद्यार्थ्यांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. दुपारच्या कडक उन्हात शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी जाताना होणारा त्रास टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या (शासकीय, अनुदानित व खासगी) शाळा व महाविद्यालयांच्या वेळांमध्ये तात्पुरता बदल कर...

वरोर्यात शांतता समितीची बैठक; गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद सद्भावनेत साजरे करण्याचा निर्धार

वरोर्यात शांतता समितीची बैठक; गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद सद्भावनेत साजरे करण्याचा निर्धार


वरोरा, २४ ऑगस्ट २०२५: पुढील काही दिवस संपूर्ण महाराष्ट्रात उत्सवमय वातावरण असणार आहे. वरोरा शहरातही सार्वजनिक गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद हे दोन्ही सण यावर्षीही परंपरेप्रमाणेच शांततेच्या व सद्भावनेच्या वातावरणात साजरे करण्यात येणार आहेत. हे दोन्ही उत्सव कोणत्याही गालबोट न लागता भक्तिमय वातावरणात संपन्न व्हावे यासाठी शुक्रवारी सिद्धिविनायक मंगल कार्यालय, वरोरा येथे शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी खासदार प्रतिभाताई धानोरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.

शहरातील प्रमुख सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व मुस्लिम बांधवांनी या बैठकीत सहभागी होत नेहमीप्रमाणेच बंधुभाव व सद्भावना जपण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे, उपविभागीय अधिक्षक श्री. संतोष बाकल, सहाय्यक जिल्हाधिकारी श्री. अमर राऊत, तहसीलदार श्री. योगेश कौटकर, वीज वितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता श्री. सचिन बदकल यांच्यासह असंख्य नागरिक उपस्थित होते.

बैठकीदरम्यान सणादरम्यानची सुरक्षा, वीजपुरवठा, आरोग्यसेवा यासारख्या मूलभूत सुविधांच्या तरतुदीवर चर्चा झाली. सर्वांनी मिळून हे सण शांततेने आणि आनंदात साजरे करण्याचे आवाहन केले. खासदार धानोरकर यांनी सर्व समुदायांना एकत्रितपणे उत्सव साजरे करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.
***************

Comments