वाढत्या उन्हामुळे शाळा - महाविद्यालये सकाळच्या सत्रात 11 वाजेपर्यंतच ठेवाØ जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी निर्गमित केले आदेश

वाढत्या उन्हामुळे शाळा - महाविद्यालये सकाळच्या सत्रात 11 वाजेपर्यंतच ठेवा  जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी निर्गमित केले आदेश चंद्रपूर, दि. 19 : जिल्ह्यात सध्या वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 11 मार्च 2026 रोजी आयोजित बैठकीत शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद यांना शाळा सकाळ सत्रात घेण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाचा तीव्र तडाखा जाणवत असून तापमान 44 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः उष्माघात (सन स्ट्रोक) व इतर उष्णतेशी संबंधित आजारांचा धोका लक्षात घेता विद्यार्थ्यांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. दुपारच्या कडक उन्हात शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी जाताना होणारा त्रास टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या (शासकीय, अनुदानित व खासगी) शाळा व महाविद्यालयांच्या वेळांमध्ये तात्पुरता बदल कर...

खाजगी पेन्शन धारकांना न्याय द्या. संसद पायऱ्यावर काँग्रेस जोरदार निदर्शने.

खाजगी पेन्शन धारकांना न्याय द्या. संसद पायऱ्यावर काँग्रेस जोरदार निदर्शने. 


वरोरा, 6 ऑगस्ट 
चेतन लूतडे 

आज संसद भवनाच्या पायऱ्यांवर सर्व काँग्रेस खासदारांनी एकत्र येऊन खासगी क्षेत्रातील पेन्शनधारकांच्या न्याय्य आणि सन्मानजनक पेन्शनच्या मागणीसाठी सरकारविरोधी जोरदार आंदोलन केले.

 खासगी क्षेत्रात आयुष्यभर प्रामाणिक सेवा बजावलेल्या असंख्य कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर योग्य पेन्शन मिळावी, ही त्यांची मूलभूत आणि वाजवी अपेक्षा असताना, केंद्र सरकारकडून त्यांच्या या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत काँग्रेस खासदारांनी हातात फलके व घोषणापत्रे घेऊन संसद भवनासमोर उत्स्फूर्त निदर्शने केलीत.

लोकतंत्र मे बहस जरुरी हैl, चर्चा नको चूप्पी नही चलेगीl, वोटर नही सरकार बदलेगीl  या पद्धतीचे घोषणापत्र लिहून सदनाच्या बाहेर काँग्रेस खासदारांनी तीव्र निदर्शने करून सरकारचे लक्ष वेधले होते.

यामध्ये खासदार प्रतिभाताई धानोरकर, खासदार वर्षाताई गायकवाड यासह अनेक काँग्रेस खासदार उपस्थित होते. काँग्रेस पक्षाने नेहमीच श्रमिक, शेतकरी, कामगार, निवृत्त कर्मचारी व सामान्य जनतेच्या हिताचा पाठपुरावा केला आहे आणि भविष्यातही अशाच प्रकारे सर्व प्रकारच्या अन्यायाविरुद्ध लढत राहील, असे आंदोलनादरम्यान  काँग्रेस पक्षाकडून जाहीर करण्यात आले.


Comments