वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोध मोहीम शासनाने राबवावी- नितीन मत्ते

शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोध मोहीम शासनाने राबवावी- नितीन मत्ते 

वरोरा दि ७ ऑगस्ट 
फक्त बातमी 

       केंद्र व राज्य शासनाच्या सात वर्षावरील बालकांच्या शिक्षणाच्या सक्तीच्या शिक्षणाच्या कायद्यांतर्गत शाळाबाह्य विद्यार्थ्यांची मोहीम चंद्रपूर जिल्ह्यात तीव्र करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादासाहेब भुसे यांना दिलेल्या निवेदनातून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी केली.
      चंद्रपूर जिल्हा हा संपूर्ण महाराष्ट्रात औद्योगिक जिल्हा म्हणून परिचित आहे .या जिल्ह्यामध्ये चार पावर प्लांट,असंख्य कोळसाखदानी व सिमेंट उद्योग, लोह खनिजावर प्रक्रिया करणारे कारखाने ,फलोराइड माईन, इत्यादी कारखाने कार्यरत आहेत. सदर कारखान्यांमध्ये रोजंदारी मजूर मजुरी करणारे भरपूर परप्रांतीय मजूर आहेत त्यांचे पाल्य नियमित शाळेत जात नाहीत .त्याचप्रमाणे कैचीला धार लावणारे, कचरा वेचणाऱ्यांची मुले ,त्याचप्रमाणे विविध सिग्नल वर भिक्षा मागणारी मुले या सगळ्यांची नावे शाळेमध्ये दाखल आहेत. मात्र त्यांची उपस्थिती शाळेमध्ये अत्यल्प आहे किंवा नगण्य आहे.
 तेव्हा अशा मुलांना शाळाबाह्य विद्यार्थी संबोधता येईल. करिता अशा मुलांना किमान साक्षर करता यावे व केंद्र आणि राज्य शासनाच्या शिक्षणाच्या सक्तीच्या कायद्याअंतर्गत अशा शाळाबाह्य मुलांचे शोधन करून त्यांना  परत शाळेमध्ये टाकण्याचा कायदा असताना देखील चंद्रपूर जिल्ह्यातील शिक्षण विभाग हेतू पुरस्कर  याच्याकडे दुर्लक्ष करीत आहे.
      या संपूर्ण परिस्थितीची जाणीव शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी गुरुवारी शालेय मंत्री दादाजी भुसे यांना करून दिली व जिल्ह्यात शाळाबाह्य विद्यार्थी शोध मोहीम तीव्र करण्यासंदर्भात निवेदन दिले. याप्रसंगी तालुकाप्रमुख श्रीकांत खगार, भद्रावती तालुका संघटक सुरज शहा, सुमित हस्तक, भद्रावती उपशहर प्रमुख मनीष बुचे, अविनाश उके इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.

Comments