वाढत्या उन्हामुळे शाळा - महाविद्यालये सकाळच्या सत्रात 11 वाजेपर्यंतच ठेवाØ जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी निर्गमित केले आदेश

वाढत्या उन्हामुळे शाळा - महाविद्यालये सकाळच्या सत्रात 11 वाजेपर्यंतच ठेवा  जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी निर्गमित केले आदेश चंद्रपूर, दि. 19 : जिल्ह्यात सध्या वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 11 मार्च 2026 रोजी आयोजित बैठकीत शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद यांना शाळा सकाळ सत्रात घेण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाचा तीव्र तडाखा जाणवत असून तापमान 44 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः उष्माघात (सन स्ट्रोक) व इतर उष्णतेशी संबंधित आजारांचा धोका लक्षात घेता विद्यार्थ्यांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. दुपारच्या कडक उन्हात शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी जाताना होणारा त्रास टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या (शासकीय, अनुदानित व खासगी) शाळा व महाविद्यालयांच्या वेळांमध्ये तात्पुरता बदल कर...

आमदार करन देवतळे यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्यस्तरीय योगासन स्पर्धेचे उद्घाटन

आमदार करन देवतळे यांच्या हस्ते  महाराष्ट्र राज्यस्तरीय योगासन स्पर्धेचे उद्घाटन

चंद्रपूर, २५ ऑगस्ट २०२५: आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन आणि चंद्रपूर जिल्हा योगासन क्रीडा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सहावे महाराष्ट्र राज्यस्तरीय योगासन क्रीडा स्पर्धा (वरिष्ठ गट) या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. स्पर्धा २२, २३ आणि २४ ऑगस्ट या कालावधीत आनंदवन येथे पार पडली.

या राज्यस्तरीय स्पर्धेचे उद्घाटन आमदार श्री. करन देवतळे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी डॉ. भारतीताई आमटे, श्रीकांत पाटील, डॉ. अरुण खोडस्कर, डॉ. मृणाल काळे, सुधाकर कहु, प्रा. सवाने, डॉ. विजय पोळ, राजेश पवार, माधव कवीवर, कवीश्वर सर, तानाजी बायस्कर आणि देशमुख सर या गणमान्य व्यक्तींची उपस्थिती होती.

स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या योगपटूंनी आपले कौशल्य प्रदर्शित केले. योगपटूंनी केलेल्या उत्तम सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकली.

योगासन ही केवळ क्रीडा नसून तो आरोग्य, मनःशांती आणि एकाग्रतेचा अमूल्य वारसा आहे, असे स्पर्धेच्या निमित्ताने सांगण्यात आले. अशा स्पर्धांमुळे तरुणांमध्ये शिस्त, तंदुरुस्ती आणि आत्मविश्वास वाढेल, अशी खात्री यावेळी व्यक्त करण्यात आली.

Comments