प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

*महाकाल कावड यात्रा उत्साहात भटाळ्याला रवाना**वरोड्यात नव्हे तर जिल्ह्यात प्रथमच महाकाल कावड यात्रेचे आयोजन**जागृती फाउंडेशनचा उपक्रम*

*महाकाल कावड यात्रा उत्साहात भटाळ्याला रवाना*

*वरोड्यात नव्हे तर जिल्ह्यात प्रथमच महाकाल कावड यात्रेचे आयोजन*

*जागृती फाउंडेशनचा  उपक्रम*

वरोडा : शाम ठेंगडी
        वरोडा येथील जागृती फाऊंडेशनच्या वतीने श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी म्हणजे आज 28 जुलैला महाकाल कावड यात्रा येथील आंबेडकर चौकातून मोठ्या उत्साहात व जल्लोषात भटाळ्याला रवाना झाली. या कावड यात्रेत पुरुष, महिला, युवक, युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
       या कावड यात्रेत काही छोटी मुले ही सहभागी झाली होती. कावड यात्रेत सहभागी रुहीणा धनवलकर ही सात वर्षीय बालिका सर्वांचे लक्ष वेधून घेत होते हे विशेष. ही कावड यात्रा येथील आंबेडकर चौकातून निघून तालुक्यातील भटाळा येथील प्राचीन शिवमंदिरात दुपारी तीन च्या सुमारास पोहोचली.तेथे गंगा व नर्मदा नदीच्या पवित्र जलाने महादेवाच्या लिंगाला जलाभिषेक करण्यात आला. यावेळी हरीश जाधव यांचेसह भटाळ्याचे नागरिक ही उपस्थित होते. वरोड्यातून प्रथमच अशा प्रकारच्या महाकाल कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
         येथील आंबेडकर चौकातून सकाळी दहा वाजता निघालेली ही महाकाल कावड यात्रा आंबेडकर चौक- सपाटे चौक-शहीद योगेश दाहुले-रत्नमाला चौक- आनंदवन चौक असा होत चिमूर रोडने खैरगाव- परसोडा-खातोडा- सालोरी या मार्गाने भटाळा येथील महादेव मंदिरात पोहोचली. या शोभायात्रेच्या मार्गात यात्रेत सहभागी भक्तांसाठी हरीश केशवानी व मित्र मंडळातर्फे साबुदाणा  उसळ व लेमन टी, श्याम टोकसिया व अजय रेड्डी यांच्याकडून लिंबू पाणी, मनीष जयस्वाल यांच्याकडून फळ वाटप करण्यात आले. संपूर्ण यात्रेत क्लबच्या वतीने पिण्याच्या थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या शोभायात्रेसोबत गांधी योग मंडळाच्या रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली होती. कावड यात्रेत सहभागी सर्वांनी भगव्या टोप्या परिधान केल्या होत्या.या कावड यात्रेत ग्रामीण भागातील ही युवक सहभागी झाले होते. आंबेडकर चौकातून शोभायात्रा निघत असताना जागृती फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रवीण धनवलकर, श्याम टोकसिया, हितेश बजाज,योगेश डोंगरवार,शिरीष उगे,रुपलाल कावळे यांचे उपस्थितीत कावड यात्रेतील सर्व कावडची पूजा करण्यात आली. यावेळी राधे राधे महाराज यांनी पौरोहित्य केले. यानंतर शंखनाद झाल्यानंतर कावड यात्रेला प्रारंभ झाला. यावेळी *' बम बम बोले', 'जय महाकाल'* अशा घोषणा दिल्या जात होत्या.
       यानंतर भटाळा येथील प्राचीन महादेव मंदिरातील शिवलिंगाला गंगा,यमुना, सरस्वती, नर्मदा, शिप्रा या पाच नद्यांच्या पवित्र जलाने जलाभिषेक करण्यात आला.
    या महाकाल कावड यात्रेसाठी ओम सुधाकर वरभे यांचे कडून ओंकारेश्वर येथील नर्मदा नदीचे व उज्जैन येथील शिप्रा नदीचे तर गंगा, यमुना, सरस्वती या त्रिवेणी संगमाचे पवित्र जल श्याम टोकसिया यांचेकडून उपलब्ध करून देण्यात आले आहे. गंगासागर येथील गंगा नदीचे पवित्र जल जागृती फाऊंडेशनने उपलब्ध करून दिली आहे.
        संपूर्ण महाकाल कावड यात्रेदरम्यान चौक पोलीस बंदोबस्त होता.

Comments