वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

भगवा ध्वज राष्ट्रजीवनातील स्फूर्तीकेंद्र : मीरा कडबे*

*भगवा ध्वज राष्ट्रजीवनातील स्फूर्तीकेंद्र : मीरा कडबे*

वरोडा : शाम ठेंगडी

भगवा ध्वज राष्ट्रजीवनातील स्फूर्तिकेंद्र आहे. सध्या धर्म आणि संस्कृती यांवर विविध आघात होत असून त्यांचा यथाशक्ती प्रतिकार केला पाहिजे. कधीकधी विचारांच्या विसंगतीमुळे चमत्कारिक स्थिती निर्माण होते. आताच्या काळात स्त्री साक्षरतेपेक्षा तिचे एकूण सशक्तीकरण काळाची गरज आहे. व्यक्तीचे विचार हे कालसापेक्ष असतात.राष्ट्रासाठी त्याग व समर्पण करण्याची प्रेरणा देण्याचे सामर्थ्य भगव्या ध्वजात आहे. यातून उत्तम संघटन आणि युवा पिढी घडविण्याचे काम होते, असे विचार नागपूर येथील नरकेसरी प्रकाशनाच्या संचालीका आणि कुटुंब उद्बोधक मीराताई कडबे यांनी व्यक्त केले.        

           श्रीराम मंदिर देवस्थान येथे 13 जुलै रोज रविवारला झालेल्या राष्ट्र सेविका समितीच्या गुरुपौर्णिमा उत्सवात  उद्बोधक म्हणून त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी रा. से. समितीच्या नगर कार्यवाहीका अपूर्वा बुजोणे व्यासपीठावर उपस्थित होत्या. 

 ‌.       मीरा कडबे यांनी लव्ह जिहाद सारख्या दुर्दैवी मुद्द्यांचा कायमस्वरूपी नायनाट व्हावा आणि आपत्ती व संकटाच्या काळात आजच्या स्त्रीने खंबीर होण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी यावेळी मांडले.
          ध्वजारोहण आणि समिती प्रार्थनेनंतर रसिका घुडे यांनी प्रास्ताविक  केले. पल्लवी धनेगावकर यांनी वैयक्तिक तर शुभा रेलकर हिने सांघिक गीत सादर केले. आर्या घुडे हिने अमृत वचन तर अवंती घुडे यांनी सादर केले. मयुरी घुडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाची सांगता डॉ. जयश्री शास्त्री यांनी गायलेल्या वंदे मातरमने झाली.


Comments