वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

वरोरा शहरातील मध्यवर्ती रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू – नागरिकांनी व्यक्त केले समाधान**

वरोरा शहरातील मध्यवर्ती रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू – नागरिकांनी व्यक्त केले समाधान

वरोरा
चेतन लूतडे वरोरा 

: शहराच्या मध्यभागी असलेल्या व्यापारी मार्गावरील रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे अनेक नागरिकांना दैनंदिन त्रास सहन करावा लागत होता. मात्र, आता **राजबूक सेंटर दुकानापासून ते डोंगरवार चौक (भगवान महावीर स्वामी चौक)** पर्यंतच्या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती सुरू झाली असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यामुळे शहरवासीयांनी समाधान व्यक्त केले आहे.  

 *सामाजिक कार्यकर्त्यांनी केली होती मागणी*
या रस्त्याची वाढती झीज आणि खड्डे यामुळे वाहतूक अडथळे निर्माण झाले होते, तसेच पावसाळ्यात येथे पाण्याचा साठा राहून प्रदूषणाची समस्या निर्माण होत असे. याबाबत **वरोरा शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी** लोकप्रतिनिधींकडे वारंवार लक्ष वेधले होते. त्यांच्या सततच्या प्रयत्नांनंतर शहरातील या महत्त्वाच्या मार्गावर दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे.  

 **नागरिकांची प्रतिक्रिया**  
रस्त्याच्या दुरुस्तीमुळे स्थानिक व्यापाऱ्यांसह स्थानीय नागरिकांना  समाधान वाटत आहे.  *"या रस्त्यावरून वाहने सतत जान्याने अडथळा निर्माण होत होती , गाडी गेल्यामुळे पाणी अंगावर पडत होते , गॅसच्या गाड्या व ग्राहकांना येण्यात अडचण येत होती. आता दुरुस्तीनंतर व्यवसायाला चालना मिळेल."
*प्रशासनाची प्रतिक्रिया*  
स्थानिक नगरपालिका अधिकाऱ्यांनी सांगितले की, **"या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आवश्यक ती तांत्रिक आणि आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. काम योग्य वेळेत पूर्ण होईल."**  

*"सामूहिक प्रयत्नांमुळेच शहराचा विकास शक्य आहे"*
असे मत प्रवीण सुराणा यांनी व्यक्त केले. — स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांचा
**************""***************

Comments