वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

वरोरा-भद्रावतीत अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे जनतेचा संताप, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अल्टिमेटम

 वरोरा-भद्रावतीत अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे जनतेचा संताप, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अल्टिमेटम

वरोरा, २२ जुलै २०२५:
चेतन लूतडे 
उपविभागीय अधिकारी (SDO), पोलीस उपविभागीय अधिकारी (SDPO) आणि नगरपरिषद मुख्याधिकारी (Municipal Commissioner) या तीन महत्त्वाच्या पदांची मुंबई-महाराष्ट्र शासनाने अद्याप नियुक्ती न केल्याने वरोरा-भद्रावती क्षेत्रातील जनतेचे असंतोष वाढत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) तालुका शाखेने आज तहसीलदार कार्यालयात निवेदन सादर करून ७ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे, अन्यथा तीव्र आंदोलनाची इशारा दिली आहे.  

१. **उपविभागीय अधिकारी (SDO):** ४ महिने रिक्त. वरोरा (१८६ गावे) व भद्रावती (१६५ गावे) या दोन्ही तालुक्यांचा कार्यभार अडकला आहे.  
२. **नगरपरिषद मुख्याधिकारी:** ३ महिने रिक्त. शहरी विकासाची कामे ठप्प.  
३. **पोलीस उपविभागीय अधिकारी (SDPO):** २० दिवस रिक्त. गुन्हे नियंत्रणासाठी अधिकारी नसल्याने कायदा-सुव्यवस्था धोक्यात.  
४. **डीपी पथक:** २ महिने बरखास्त. गुन्हेगारी वाढीची चिंता.  

जनतेची तक्रार:  
- कार्यालयीन कामासाठी दूरच्या ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना "अधिकारी नसल्याने" परत जावे लागते.  
- भाजपाचा आमदार असूनही प्रशासनाने या क्षेत्राकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. *"जनतेने भाजपाला निवडून दिले, पण फसगत झाल्याची भावना आहे"* असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
- पोलीस स्टेशनवर अधिकारी नसल्याने गुन्ह्यांचे निवारण होत नाही.  

MNS ची मागणी व इशारा:  
- तालुका अध्यक्ष प्रशांत जुंजारे, आलोक जाधव यांच्या नेतृत्वात MNS ने **७ दिवसात** रिक्त पदे भरण्याची मागणी केली आहे.  
- चेतावणी: **"८व्या दिवशी आम्ही मनसे पद्धतीने (आक्रमक पद्धतीने) आंदोलन सुरू करू करण्याचा इशारा मनसेनी दिला आहे.  




Comments