वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

*राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा माणूस घडविण्याचे केंद्र: सागर अहेर* *वरोडा शाखेच्या गुरुपौर्णिमा उत्सवात केले प्रतिपादन*

*राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा माणूस घडविण्याचे केंद्र: सागर अहेर* 
*वरोडा शाखेच्या गुरुपौर्णिमा उत्सवात केले प्रतिपादन*
 वरोडा : श्याम ठेंगडी 
            कोणतीही अपेक्षा न ठेवता राष्ट्रकार्य निस्वार्थपणे करीत राहणाऱ्या स्वयंसेवकामुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज शतकी वर्षात पोहचला आहे.
 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य करताना हे मी केलं,असा भाव न ठेवता जे केलं ते राष्ट्रासाठीच केलं ही भावना यामागे आहे.  संघाचा आपल्या शतकी वर्षात स्वभाषा, समरसता, कुटुंब व्यवस्था, पर्यावरण व नागरिक कर्तव्य या पंचसूत्रीवर भर असून सर्व सज्जनशक्ती सोबत घेऊन काम करायचे ही संघाची भूमिका आहे. आज अनुकूलता असली तरी संघकार्य सकारात्मक भूमिका घेऊन करण्याची गरज आहे. हे करत असताना समाजातील सर्व समस्यांचा विचार करून त्या पूर्ण करण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चंद्रपूर विभाग सहप्रचारक सागर अहेर यांनी मांडले. 
    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरोडा शाखेच्या 10 जुलै रोज गुरुवारला झालेल्या गुरुपौर्णिमा उत्सवात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी तालुका संघचालक सुनील सरोदे, नगर संघ चालक मनोज रेलकर हे व्यासपीठावर उपस्थित होते.
            संघाचा स्वयंसेवक हा संघाच्या दैनिक शाखेतून घडतो. शाखा ही व्यक्ती निर्माण करण्याचे केंद्र आहे. शतकी वर्षात हिंदुत्व म्हणून पोहोचलो नाही असा एकही परिवार राहणार नाही असे सांगत स्वयंसेवकांनी आपल्या कार्यातून फेक नॅरेटिव्ह पसरविण्या-यांना चांगल्या व खऱ्या नॅरेटिव्हची जाणीव करून देण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
 ‌‌.    कार्यक्रमाच्या सुरुवातीला परमपूजनीय भगवा ध्वजाचे पूजन झाल्यानंतर *चलो जगाये विश्व शक्ती संघटित होकर* हे समूहगीत सादर करण्यात आले. आशिष हरणे यांनी हिंदू संस्कृतीत गुरुपौर्णिमेचे महत्त्व विशद केले तर मदन पांडे यांनी सुभाषित तर चिन्मय खंते यांनी अमृत वचन सादर केले. युवराज शेंडे यांनी *मातृ मंदिर का समर्पित दीपसे, चाह मेरी यह की मै जलता रहू* हे वैयक्तिक गीत सादर केले. प्रार्थनेनंतर प्रसाद वितरणानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.


Comments