वरोरा नगर परिषदेच्या सजावटीदार लाईट निविदा रद्द करण्याची मागणी; विरोधक आक्रमक

वरोरा नगर परिषदेच्या सजावटीदार लाईट निविदा रद्द करण्याची मागणी; विरोधक आक्रमक वरोरा: वरोरा नगर परिषदेने अंबादेवी मंदिर ते बशीर ऑईल मिलपर्यंत सजावटीदार स्ट्रीट लाईट बसविण्यासाठी काढलेल्या निविदेमुळे शहरातील राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. विरोधी गटातील नगरसेवकांनी ही निविदा रद्द करण्याची मागणी मुख्याधिकाऱ्यांकडे केली असून, हा शासकीय निधीचा गैरवापर असल्याचा आरोप केला आहे. विरोधी गटाच्या नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात, प्रस्तावित मार्गावर सध्या असलेल्या स्ट्रीट लाईट पूर्णपणे सुस्थितीत असल्याचे म्हटले आहे. नगरसेवक कुरेकर यांनी नमूद केले की, जनतेकडून अशा कामाची कोणतीही मागणी नसताना नवीन सजावटीदार लाईट बसविणे म्हणजे प्रशासनाचा गैरकारभार आहे. विरोधकांनी केलेल्या मुख्य आक्षेपांपैकी एक म्हणजे दलित वस्ती प्रभागातील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. निवेदनात म्हटले आहे की, दलित वस्ती प्रभागात नाली बांधकाम, रस्ते, हँडपंप दुरुस्ती व शौचालये यासारख्या मूलभूत गरजा असताना केवळ दिसायला आकर्षक अशा सजावटीदार लाईटवर खर्च करणे संशयास्पद आहे. ...

रात्रीच्यावेळी अवैध रेती उत्खनन करणाऱ्या रेती माफियाची मुजोरी सहन केली जाणार नाही.सुर्या अडबाले .

रात्रीच्यावेळी अवैध रेती उत्खनन करणाऱ्या रेती माफियाची मुजोरी सहन केली जाणार नाही.
सुर्या अडबाले .

वरोरा 
चेतन लूतडे 

चंद्रपूर जिल्ह्यातील 48 रेती घाट लिलाव झाल्यानंतर रेती घाट धारक रात्रीच्या वेळी अवैध रेती वाहतूक होतं असल्याने शेतकऱ्यांना रेती माफिया धमकी देत आहेत. रस्ते खराब होऊन गावाकऱ्यांना रात्रीचा रेती वहन करणाऱ्या गाड्यांचा त्रास होतं असल्याने यावर त्वरित प्रतिबंध काढण्याबाबत निवेदन सादर केले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील जवळपास 48 रेती घाट लिलाव होऊन रेती उत्खनन सुरु आहे, पण ज्या नियम व अटी शर्ती नुसार रेती घाट लिलाव करण्यात आले ते सगळे नियम धाब्यावर बसवून बेकायदेशीरपणे रेती उत्खनन करण्यात येतं आहे व रेतीची रात्रीच्या वेळेस अवैध वाहतूक होतं आहे,

येत्या 10 जून 2025 पर्यंत सगळ्या रेती घाटातून रेती उत्खनन सुरु असून सध्या रेतीचा स्टॉक करत असल्याचे दाखवीन्यात येतं आहे. मात्र प्रत्यक्षात दिवसारात्र नदी घाटातून रेती उत्खनन होऊन रेती खुल्या बाजारात चढ्या भावाने विकल्या जात आहे, दरम्यान दिवसारात्र चालणाऱ्या रेती गाड्या शेतकऱ्यांने विरोध केला तर त्यांना घाबरवण्याचे काम रेती माफिया करत आहेत. अशाच अवैध रेती उत्खनना मुळे चंद्रपूर जिल्यातील खून व मोठे गुन्हे आधी पण झाले असून गावातील पांदन रस्ते खराब करत तर आहेच शिवाय रात्रीच्या वेळी काही गावगुंड हत्यार घेऊन रात्रीच्या वेळी दहशत पसरवत असल्याने व दिवसरात्र चालणाऱ्या रेती च्या गाड्यांमुळे रात्रीच्या वेळी कित्तेकांची झोपमोड होतं असून जनजीवन जणू विष्कळीत होतं असल्यामुळे आपण त्वरित यावर प्रतिबंध लावावा व रेती माफिया कडून होत असलेली शेतकऱ्यांवर दादागिरीची भाषा सहन करणार नाही यावरती लवकरात लवकर प्रतिबिंब लावण्यात आले नाही तर शेतकऱ्यांच्या हक्कासाठी स्वराज्य शेतकरी संघटनेच्या माध्यमातून जन आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.

करिता चंद्रपूर जिल्ह्यातील त्वरित अवैध रेती उत्खनन करणाऱ्या ठेकेदार व त्यांची कंपनीला दिलेली परमिशन कॅन्सल करावी व दोषी वरती कठोर कारवाई करून संबंधितावर गुन्हे दाखल करावे  अशी मागणी  सूर्या अडबाले  संस्थापक स्वराज्य शेतकरी संघटना चंद्रपूर च्या वतीने करण्यात आला आहे.
या संदर्भातील प्रतिलीपी जिल्हा खनीकर्म अधीकारी, चंद्रपूर , पोलीस अधीक्षक साहेब, चंद्रपूर , विभागीय अधिकारी साहेब.चंद्रपूर, तहसीलदार साहेब.चंद्रपूर यांना देण्यात आले आहे.




Comments