प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

*टायगर सफारीला मिळणार वेग : आमदार जोरगेवार यांच्या प्रयत्नांनतर वनमंत्री यांची मंत्रालयात बैठक.**अंमलबजावणीसाठी जागतिक दर्जाचे नियोजन करण्याचे वनमंत्री यांचे निर्देश*

*टायगर सफारीला मिळणार वेग : आमदार जोरगेवार यांच्या प्रयत्नांनतर  वनमंत्री  यांची मंत्रालयात बैठक.*

*अंमलबजावणीसाठी जागतिक दर्जाचे नियोजन करण्याचे वनमंत्री यांचे निर्देश*

फक्त बातमी 
अंकुश अवथे चंद्रपूर 
 
 चंद्रपूरमध्ये प्रस्तावित असलेल्या टायगर सफारी प्रकल्पास गती देण्यासाठी मुंबई येथील मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूरच्या पर्यटनवाढीसाठी आणि स्थानिक युवकांसाठी रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने या प्रकल्पाची अत्यंत आवश्यकता असल्याचे स्पष्टपणे मांडले. त्यांच्या सूचनांनुसार वनमंत्री गणेश नाईक यांनीही या प्रकल्पाबाबत सकारात्मकता दर्शवत निधी वितरणाची प्रक्रिया गतीमान करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीस आमदार किशोर जोरगेवार, राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक आणि वन बल प्रमुख शोमिता बिस्वास, अप्पर मुख्य सचिव (वने) मिलिंद म्हसेकर, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक व समन्वय अधिकारी नरेश झुरमुरे, वनविकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर बोडे, महाव्यवस्थापक (मुख्यालय) बेऊला माथी, चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, उपवनसंरक्षक विवेक होसिंग तसेच महाराष्ट्र इको टुरिझम डेव्हलपमेंट बोर्डाचे सदस्य अरुण तिखे यांची उपस्थिती होती.
चंद्रपूरच्या मूल रोडवरील वन अकादमीच्या मागील बाजूस १७१ हेक्टर क्षेत्रात टायगर सफारी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यासाठी 580 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. सदर प्रकल्पाचा आराखडा महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या अधिनस्त एफडीसीएम गोरवाडा झू लिमिटेड यांच्याकडे तयार करण्यासाठी देण्यात आला आहे. या प्रकल्पात ऑस्ट्रेलियन, साउथ अमेरिकन, साउथ आफ्रिका आणि इंडियन ट्रेल अश्या वेगवेगळ्या थीमवर आधारित प्राणीदर्शन झोन असतील. यामध्ये कॅंगारू, जग्वार, माकडे, कॅपीबारा, विविध रंगीबेरंगी पक्षी अशा अनेक विदेशी व देशी प्राणी पर्यटकांना पाहता येणार आहेत. याशिवाय ४४ हेक्टर क्षेत्रात वाहन सफारी आणि २० एकर क्षेत्रात चिल्ड्रन पार्क व इतर पर्यटकांसाठी सुविधा विकसित केल्या जाणार आहेत.
या प्रकल्पामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रात मोठी वाढ होणार असून स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील. या संदर्भात आमदार किशोर जोरगेवार यांनी ताडोबाच्या सफारीसाठी लाखो पर्यटक चंद्रपूरला येतात. मात्र अनेकदा वाघाचे प्रत्यक्ष दर्शन होत नाही. नव्या टायगर सफारीमुळे पर्यटकांना हमखास वाघाचे दर्शन होईल, तसेच विदेशी प्राणीही पाहायला मिळतील. त्यामुळे चंद्रपूरच्या पर्यटनात लक्षणीय वाढ होऊन  जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
या बैठकीत पुढील टप्प्याचे नियोजन आणि निधी वितरणाबाबत निर्णय घेण्यात आले. यावेळी वनमंत्री गणेश नाईक यांनी अधिकाऱ्यांना एफडीसीएम गोरवाडा झू लिमिटेडने तयार केलेल्या आराखड्याची सखोल व तांत्रिक तपासणी करण्यात यावी, कोणतीही त्रुटी राहू नये, याची पूर्ण काळजी घ्यावी. प्रस्तावित ट्रेल्समध्ये स्थानिक जैवविविधतेचा विचार करून पर्यावरणाचे संतुलन राखले जावे असे निर्देश दिले आहे.
ना. नाईक यांनी पुढे म्हणाले की, प्रकल्पातील प्रत्येक टप्प्यात पर्यटक, प्राणी आणि कर्मचारी यांची सुरक्षा सर्वोच्च असावी, चिल्ड्रन पार्क, भोजनगृहे, विश्रांतीगृहे, स्मृतीचिन्ह विक्री केंद्रे यासारख्या सर्व सुविधा जागतिक दर्जाच्या असाव्यात. तसेच प्रकल्पाची अंमलबजावणी नियोजनबद्ध व ठरलेल्या वेळेत पार पडावी, यासाठी सक्षम कार्ययोजना राबवली जावी असे ते म्हणाले.

Comments