महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 2026–27 : विकासाभिमुख व सर्वसमावेशक– मा. आमदार करण संजय देवतळे

महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 2026–27 : विकासाभिमुख व सर्वसमावेशक – मा. आमदार करण संजय देवतळे महाराष्ट्र राज्याचा सन 2026–27 चा अर्थसंकल्प हा राज्याच्या सर्वांगीण आणि संतुलित विकासाला गती देणारा, दूरदृष्टीचा व लोककल्याणाचा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघाचे मा. आमदार श्री. करण संजय देवतळे यांनी व्यक्त केली  या अर्थसंकल्पामध्ये राज्यातील शेतकरी, महिला, युवक, कामगार, तसेच ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करण्यात आला असून राज्याच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. शेती व शेतकरी यांच्या सक्षमीकरणासाठी शासनाने कर्जमाफी योजना जाहीर केली असून  कर्ज माफी समितीने केलेल्या शिफारशीनुसार दि. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पिक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी तसेच नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन लाभ देण्यात येणार आहे.  महिला सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य, सामाजिक सुरक्षा व रोजगा...

वारा-पावसामुळे वरोरा शहरात मोठ्या प्रमाणात नुकसान, जनजीवन बाधित


वारा-पावसामुळे वरोरा शहरात मोठ्या प्रमाणात नुकसान, जनजीवन बाधित

वरोरा (चेतन): 9/6/2025
सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे वरोरा शहरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. कच्च्या घरांची पडझड, झाडे उन्मळून पडणे, विजेच्या खांबांची दुरावस्था अशा समस्यांना तालुक्यातील लोक सामोरे गेले आहेत.  

वाऱ्याच्या जोरामुळे तालुक्यातील अनेक कच्ची घरे कोसळली असून हुडकी येथे अनेक घरांची छपरे उडून गेली आहेत. यामुळे गरीब घरांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले आहे. तसेच, आनंदवन परिसरात अनेक मोठी झाडे रस्त्यावर पडली असून काही मार्ग सकाळपर्यंत बंद होते. जिल्हा परिषद शाळेच्या आवारात झाड पडले असून, सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही.  
विजेच्या खांबांना झालेल्या नुकसानामुळे तालुक्यातील अनेक भागात विजेचे पुरवठ्यात व्यत्यय आला होता. विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी लाईन दुरुस्तीसाठी तातडीने काम सुरू केले आहे.  

या संकटकाळात गरजूंना मदत मिळावी यासाठी संबंधित विभागाने लगेच दखल घेऊन पुनर्वसनाच्या कामाला सुरुवात करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. तालुक्यातील प्रशासनाकडून पीडितांना तातडीने मदत करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
...........

Comments