वरोऱ्यात पुस्तक विक्रीसाठी ‘सेटिंग’ ? विद्यार्थ्यांना शाळेचा नवीन सेट घेणे बंधनकारक.शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल .

वरोऱ्यात पुस्तक विक्रीसाठी ‘सेटिंग’ ? विद्यार्थ्यांना शाळेचा नवीन सेट घेणे बंधनकारक. शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल . वरोरा, ता. 30 (प्रतिनिधी): वरोरा येथील सेंट ॲनिस हायस्कूल प्रशासनावर पुस्तक विक्रीत नफेखोरीचा गंभीर आरोप होत असून, स्थानिक पुस्तक विक्रेत्यांना डावलून बाहेरील विक्रेत्याला प्राधान्य दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या विरोधात शहरातील स्थानिक पुस्तक विक्रेत्यांनी गुरुवार, दि. ३० एप्रिल रोजी एकत्र येत गट शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. माहितीनुसार, सेंट ॲनिस शाळा प्रशासन यापूर्वीही विविध कारणांमुळे चर्चेत राहिले आहे. काही दिवसांपूर्वी शाळेमधूनच पाठ्यपुस्तके व शैक्षणिक साहित्य विक्री होत असल्याचा आरोप झाला होता. यानंतरही प्रशासनाने अप्रत्यक्ष मार्गाने पुस्तक विक्री सुरूच ठेवल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाल्यानंतर शाळेकडून पालकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर “पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत” असा संदेश पाठविण्यात आला. मात्र प्रत्यक्षात शहरातील कोणत्याही पुस्तक विक्रेत्याकडे संबंधित या...

वारा-पावसामुळे वरोरा शहरात मोठ्या प्रमाणात नुकसान, जनजीवन बाधित


वारा-पावसामुळे वरोरा शहरात मोठ्या प्रमाणात नुकसान, जनजीवन बाधित

वरोरा (चेतन): 9/6/2025
सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे वरोरा शहरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. कच्च्या घरांची पडझड, झाडे उन्मळून पडणे, विजेच्या खांबांची दुरावस्था अशा समस्यांना तालुक्यातील लोक सामोरे गेले आहेत.  

वाऱ्याच्या जोरामुळे तालुक्यातील अनेक कच्ची घरे कोसळली असून हुडकी येथे अनेक घरांची छपरे उडून गेली आहेत. यामुळे गरीब घरांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले आहे. तसेच, आनंदवन परिसरात अनेक मोठी झाडे रस्त्यावर पडली असून काही मार्ग सकाळपर्यंत बंद होते. जिल्हा परिषद शाळेच्या आवारात झाड पडले असून, सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही.  
विजेच्या खांबांना झालेल्या नुकसानामुळे तालुक्यातील अनेक भागात विजेचे पुरवठ्यात व्यत्यय आला होता. विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी लाईन दुरुस्तीसाठी तातडीने काम सुरू केले आहे.  

या संकटकाळात गरजूंना मदत मिळावी यासाठी संबंधित विभागाने लगेच दखल घेऊन पुनर्वसनाच्या कामाला सुरुवात करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. तालुक्यातील प्रशासनाकडून पीडितांना तातडीने मदत करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
...........

Comments