खाकीची मान उंचावली! पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा भव्य सत्कार: पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला

खाकीची मान उंचावली! पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा भव्य सत्कार  पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला बातमी: वरोरा 16/4/26 वरोरा : १४ एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीच्या उत्सवी वातावरणात आंबेडकर चौक, वरोरा येथे अचानक आग लागल्याची घटना घडली. या गंभीर प्रसंगी सहाय्यक  पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांनी विलक्षण तत्परता आणि धाडस दाखवत स्वतः पुढाकार घेत, आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. त्यांच्या या वेगवान व धैर्यशील कृतीमुळे मोठा अनर्थ टळला. या पराक्रमाची दखल घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, वरोरा तर्फे पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना पुष्पगुच्छ, शाल व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. शरद भस्मे यांच्या कार्यामुळे ‘खाकी’ वर्दीवरील विश्वास अधिक दृढ झाला असून, त्यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. संकटसमयी दाखवलेली त्यांची जबाबदारी, तत्परता आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी ही इतरांसाठी प्रेरणादायी ठरते. “संकटाच्या वेळी धावून येणारी खाकीच खरी जनतेची ताकद आहे,” याचे उत्तम उदाहरण म्हणजे शरद भस्मे य...

वारा-पावसामुळे वरोरा शहरात मोठ्या प्रमाणात नुकसान, जनजीवन बाधित


वारा-पावसामुळे वरोरा शहरात मोठ्या प्रमाणात नुकसान, जनजीवन बाधित

वरोरा (चेतन): 9/6/2025
सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे वरोरा शहरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. कच्च्या घरांची पडझड, झाडे उन्मळून पडणे, विजेच्या खांबांची दुरावस्था अशा समस्यांना तालुक्यातील लोक सामोरे गेले आहेत.  

वाऱ्याच्या जोरामुळे तालुक्यातील अनेक कच्ची घरे कोसळली असून हुडकी येथे अनेक घरांची छपरे उडून गेली आहेत. यामुळे गरीब घरांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले आहे. तसेच, आनंदवन परिसरात अनेक मोठी झाडे रस्त्यावर पडली असून काही मार्ग सकाळपर्यंत बंद होते. जिल्हा परिषद शाळेच्या आवारात झाड पडले असून, सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही.  
विजेच्या खांबांना झालेल्या नुकसानामुळे तालुक्यातील अनेक भागात विजेचे पुरवठ्यात व्यत्यय आला होता. विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी लाईन दुरुस्तीसाठी तातडीने काम सुरू केले आहे.  

या संकटकाळात गरजूंना मदत मिळावी यासाठी संबंधित विभागाने लगेच दखल घेऊन पुनर्वसनाच्या कामाला सुरुवात करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. तालुक्यातील प्रशासनाकडून पीडितांना तातडीने मदत करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
...........

Comments