प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

*इरई नदी खोलीकरणासाठी उद्योगांचाही पुढाकार*

*इरई नदी खोलीकरणासाठी उद्योगांचाही पुढाकार*

चंद्रपूर, दि. 14 मे : चंद्रपूर शहरात होत असलेल्या इरई नदीच्या खोलीकरण अभियानात आता जिल्ह्यातील उद्योगांनीही पुढाकार घेतला आहे. विविध उद्योगांनी आपल्या सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर फंड) नदीच्या खोलीकरणासाठी साहित्य उपलब्ध करून दिले असून यात पोकलेन, टिप्पर आणि हायवा यांचा समावेश आहे.

चंद्रपूर शहराची जीवनवाहिनी असलेल्या इरई नदीच्या खोलीकरणाच्या कामाचा शुभारंभ राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते 25 एप्रिल रोजी करण्यात आला. पहिल्या टप्प्यात रामसेतू ते चौराळा पूल या दरम्यान खोलीकरण करण्यात येत आहे. सद्यस्थितीत चार ठिकाणी काम सुरू आहे. यासाठी लॉयड्स मेटल्स कंपनीने सीएसआर निधीतून 3 पोकलेन मशीन तसेच 6 टिप्पर / हायवा उपलब्ध करून दिले आहेत. तर अल्ट्राटेक सिमेंट उद्योगाने 1 पोकलेन मशीन आणि 2 हायवा खोलीकरणासाठी दिले आहेत.

याशिवाय चार वेगवेगळ्या ठिकाणावर एकूण 8 पोकलेन मशीन कार्यरत असून यात जलसंपदा विभागाचे 3, सीएसआर निधीतून 1 आणि चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या 4 पोकलेनचा समावेश आहे. तसेच खोलीकरणासाठी एकूण 13 टिप्पर / हायवा, जेसीबी आणि 21 ट्रक्टर कार्यरत आहेत. आतापर्यंत नदी पात्रातून 21 टीसीएम गाळ (अंदाजे 7500 ब्रास) काढण्यात आला असून 26 शेतक-यांना 1158 ब्रास गाळ मोफत वाटप करण्यात आला आहे. गाळ नेण्यासाठी  आतापर्यंत 42 शेतक-यांनी अर्ज केले आहेत.

शासन, प्रशासन आणि लोकसहभाग यांच्या माध्यमातून इरई नदी खोलीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील इतरही उद्योगांनी आपले योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

००००००

Comments