वाढत्या उन्हामुळे शाळा - महाविद्यालये सकाळच्या सत्रात 11 वाजेपर्यंतच ठेवाØ जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी निर्गमित केले आदेश

वाढत्या उन्हामुळे शाळा - महाविद्यालये सकाळच्या सत्रात 11 वाजेपर्यंतच ठेवा  जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी निर्गमित केले आदेश चंद्रपूर, दि. 19 : जिल्ह्यात सध्या वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 11 मार्च 2026 रोजी आयोजित बैठकीत शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद यांना शाळा सकाळ सत्रात घेण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाचा तीव्र तडाखा जाणवत असून तापमान 44 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः उष्माघात (सन स्ट्रोक) व इतर उष्णतेशी संबंधित आजारांचा धोका लक्षात घेता विद्यार्थ्यांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. दुपारच्या कडक उन्हात शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी जाताना होणारा त्रास टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या (शासकीय, अनुदानित व खासगी) शाळा व महाविद्यालयांच्या वेळांमध्ये तात्पुरता बदल कर...

पिक कर्ज उचल सामुहिक क्षेत्रासाठी रू. ५००/- च्या स्टॅम्प ऐवजी रू. १००/- रूपयाचे स्टॅम्प पेपर शेतकऱ्यांसाठी नियमित ठेवण्याबाबत.महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन सादर.

,


 पिक कर्ज उचल सामुहिक क्षेत्रासाठी रू. ५००/- च्या स्टॅम्प ऐवजी रू. १००/- रूपयाचे स्टॅम्प पेपर शेतकऱ्यांसाठी नियमित ठेवण्याबाबत.महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे  यांना निवेदन सादर.

वरोरा :- शेतकऱ्यांना पिक कर्जाकरीता सामुहिक क्षेत्रासाठी रू ५००/- च्या स्टॅम्प ऐवजी रूपये १०० चा स्टॅम्प पेपर नियमित ठेवण्यात यावा. कारण दैनदिन कार्यामध्ये सर्व क्षेत्रात आतापर्यंत रू १००/- च्या स्टॅम्प पेपरनी कार्य होत होते. परंतू आता नविन शासन निर्णया नूसार रू ५००/- रूपयाचा स्टॅम्प घेणे हा शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड पडत असल्यामुळे रू. ५००/- स्टॅम्प शेतकरी पिक कर्जाकरीता बंद करून रू १००/- चा स्टॅम्प पेपर नियमित ठेवण्यात यावा. तसेच सध्या पिक कर्ज वाटपासाठी सामुहिक क्षेत्राकरीता स्टॅम्प पेपर जोडावे लागत असल्यामुळे रूपये रू. ५००/- चा स्टॅम्प भुर्दंड बसत असून तो ताबडतोब रद्द करून रू. १००/- रुपये स्टॅम्प करण्यात यावा असे निवेदन तालुका सेवा सहकारी संस्था संघटना, वरोरा ता. वरोरा जि. चंद्रपूर चे अध्यक्ष श्री. दत्ताभाऊ ब. बोरेकर, उपाध्यक्ष श्री. चंद्रशेखर नौकरकार तसेच सचिव श्री. अरुण खारकर, श्री. मारोतराव मोरे, श्री. सुधीर धामट, श्री. भोजराज आसुटकर यांनी मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे  महसुल मंत्री, महाराष्ट्र राज्य यांना निवेदनात दिले असून त्यांनी ताबडतोच निवेदनाची दखल घेवून शेतकऱ्यांकरीता शेतकरी पिक कर्ज उचल करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे स्टॅम्प लागणार नाही याची गाव्ही देवून तसे आदेश देण्यात आल्याचे कळविण्यात आले.


Comments