महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 2026–27 : विकासाभिमुख व सर्वसमावेशक– मा. आमदार करण संजय देवतळे

महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 2026–27 : विकासाभिमुख व सर्वसमावेशक – मा. आमदार करण संजय देवतळे महाराष्ट्र राज्याचा सन 2026–27 चा अर्थसंकल्प हा राज्याच्या सर्वांगीण आणि संतुलित विकासाला गती देणारा, दूरदृष्टीचा व लोककल्याणाचा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघाचे मा. आमदार श्री. करण संजय देवतळे यांनी व्यक्त केली  या अर्थसंकल्पामध्ये राज्यातील शेतकरी, महिला, युवक, कामगार, तसेच ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करण्यात आला असून राज्याच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. शेती व शेतकरी यांच्या सक्षमीकरणासाठी शासनाने कर्जमाफी योजना जाहीर केली असून  कर्ज माफी समितीने केलेल्या शिफारशीनुसार दि. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पिक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी तसेच नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन लाभ देण्यात येणार आहे.  महिला सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य, सामाजिक सुरक्षा व रोजगा...

शेतीच्या वादातून शेतकऱ्यांनी घेतले विष. प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे शेतकरी त्रस्त.


शेतीच्या वादातून शेतकऱ्यांनी घेतले विष. 

प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे शेतकरी त्रस्त.

वरोरा 
चेतन लूतडे वरोरा 

वरोरा तालुक्यातील बामर्डा येथील एका शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. 

 हेमंत पंढरी हरबडे वय 40 वर्ष राहणार बामर्डा या शेतकऱ्याने शेतातील कीटनाशक द्रव्य प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न स्वतःच्या राहत्या घरी केला. 
हरबडे परिवाराला सिलिंग मधील बारा एकर जमीन मिळाली होती. यामध्ये पंढरी हरभरे व चंपत हरबडे यांना सहा- सहा एकर जमीन मिळाली होती. यानंतर पंढरी हरभरे मृत पावल्यानंतर त्यांचा मुलगा हेमंत पंढरी हरबडे वडीलाची जमीन वाहत होता.  मात्र मिळालेली जमीन ही बारा एकरची नसल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला होता. यासाठी महसूल विभागाकडे काका पुतण्यांनी जमीन मोजण्यासाठी वारंवार प्रयत्न केला. मात्र प्रत्येक वेळेस जमीन कमी पडत होती. सामायिक जमीन 12 एकर चा पट्टा मोजून नंतर अर्धी अर्धी करण्यात यावी असा युक्तिवाद हेमंत हरबळे यांनी केला होता. मात्र या शेतकऱ्याचे म्हणणे कोणीच ऐकून घेत नव्हते. यानंतर चंपत हरबडे यांनी मोजणीला टाकलेली स्वतःची सहा एकर जमीन मोजण्यात आली. व फेंसिंग साठी गड्डे खोदण्याचे काम पोलिस प्रोटेक्शन मध्ये सूरू करण्यात आले होते.
मात्र शेतामधील फेन्सिंगचे गड्डे हेमंत हरबडे यांच्या शेतामध्ये आल्याने   त्यांच्या पत्नीने गड्डे खोदण्यास नकार दर्शविला. संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जोर देत शेतामध्ये गड्डे खोदायला सुरुवात केली. त्यामुळे हेमंत पंढरी हरबळे यांनी वारंवार होत असलेल्या अन्यायाच्या विरुद्ध दाद न मिळाल्यामुळे शेतातील कीटनाश द्रव्य प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी हजर असलेले पोलीस कर्मचारी यांनी अडवण्याचा प्रयत्न केला. तात्काळ शेतकऱ्याला माढळी रुग्णालया नेण्यात आले. यानंतर वरोरा उपजिल्हा रुग्णालयात शेतकऱ्याला हलवण्यात आले. यानंतर शेतकऱ्याची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात येत आहे. 

मात्र हा वाद गेल्या तीन-चार वर्षांपासून सुरू असून यामध्ये कोणताच तोडगा निघत नसल्यामुळे शेतकऱ्याने विष प्राशन केल्याचे नातेवाईकांनी सांगितले. शेतकऱ्याला साधा न्याय मिळवण्यासाठी विष प्राशन करावे लागते ही खरंच दुःखाची गोष्ट आहे. यावरून प्रशासन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर किती गंभीर आहे हे दिसून येत आहे. 
पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे. 

Comments