‘पुढे कसे होईल?’ कवितासंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याला रवींद्र शिंदे यांचे अध्यक्षपद

‘ पुढे कसे होईल?’ कवितासंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याला रवींद्र शिंदे यांचे अध्यक्षपद बातमी: चंद्रपूर ५/४/२०२६ चंद्रपूर येथील मा. सा. कन्नमवार सभागृहात ‘पुढे कसे होईल?’ या कवितासंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अक्षर साहित्य कला प्रतिष्ठान व स्तंभ पब्लिशिंग हाऊस यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी अध्यक्ष म्हणून उपस्थिती लाभवली. सोहळ्याचे उद्घाटन ज्येष्ठ शेतकरी नेते व माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी प्रसिद्ध समीक्षक डॉ. नरेंद्र आरेकर यांनी संग्रहातील कवितांवर अभ्यासपूर्ण भाष्य केले. प्रा. डॉ. राजकुमार मुसने, प्रा. डॉ. ज्योत्स्ना मोहितकर व किशोर मुघल या दिग्गज साहित्यिकांच्या उपस्थितीने सोहळा संपन्न झाला. कवी शंकर लोडे यांच्या लेखणीतून उतरलेला हा काव्यसंग्रह समाजातील विविध पैलूंवर मार्मिक भाष्य करणारा असल्याचे स्पष्ट झाले. दुसऱ्या सत्रातील कविसंमेलनाने रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. अशा साहित्यिक उपक्रमांमुळे विचारांची देवाणघेवाण होऊन समाजाला नवी दिशा मिळते,...

वेकोलीच्या कुचना क्षेत्रीय कार्यालयात खा. धानोरकर यांच्या उपस्थितीत बैठक.

वेकोलीच्या कुचना क्षेत्रीय कार्यालयात खा. धानोरकर यांच्या उपस्थितीत बैठक.

 तालुका प्रतिनिधी (भद्रावती):-
 वेकोली माजरी क्षेत्राच्या कुचना येथील क्षेत्रीय कार्यालयात खासदार प्रतिभा  धानोरकर यांच्या उपस्थितीत क्षेत्रीय महाप्रबंधकांसोबत राष्ट्रीय कोयला खदान मजदूर संघाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला खा. प्रतिभा धानोरकर,मजदूर संघाचे माजरी  क्षेत्राचे अध्यक्ष धनंजय गुंडावार, सचिव  परमानंद चौबे, संघाचे सर्व उपक्षेत्रिय  अध्यक्ष तथा सचिव उपस्थित होते. या बैठकीत कामगारांच्या समस्यांविषयी चर्चा करण्यात आली.सी एम पी एफ कार्यालयाद्वारे रिवाईज पेन्शन मध्ये होत असलेली दिरंगाई, 2017 पासून होत नसलेले पासबुक पोस्टिंग, विधवांच्या पेन्शनला होत असलेला उशीर, माजरी वसाहतीमध्ये पाच तासांची होत असलेली वीज कपात, कामगारांच्या आवास दुरुस्तीत होत  असलेला उशीरष माजरी ओपन कास्ट बंद झाल्यानंतर कामगारांना क्षेत्रातच पदस्थ करणे, कामगारांना आवास ऊपलब्ध करुन देण्यात होत असलेला भेदभाव यासह कामगारांच्या  सर्व समस्यांवर चर्चा करण्यात आली. या सर्व समस्या लवकरच निकालात काढण्यात येईल असे आश्वासन यावेळी महाप्रबंधाकडून देण्यात आले. बैठकीला चंद्रकांत बोढाले,  गोलाकुमरय्या,  पवन राय, कबीर भाईष असलम अंसारी, रवी आवारी, आनंद आंबीलकर, साईनाथ वाकुलकर, गोकुळानंद गोस्वामी, विनोद गंपावार, राजाराम ऊइके, जितेंद्र चिंचाळकर, प्रमोद वासेकर आदी  उपस्थित होते.

Comments