पर्यावरण समितीचे रेती प्रकल्पावर दुर्लक्ष. जीपीएस, सीसीटीव्ही आणि हेल्पलाइनची चेक करण्याची व्यवस्था कुचकामी ठरत आहे.

पर्यावरण समितीचे रेती प्रकल्पावर दुर्लक्ष.  जीपीएस, सीसीटीव्ही आणि हेल्पलाइनची चेक करण्याची व्यवस्था कुचकामी ठरत आहे. वरोरा /चेतन लूतडे:  वनी-मारेगाव तालुक्यातील वाळू घाटात अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याची टीका नागरिकांनी केली आहे. नागरिकाने रेती घाटांवरील नियमावली आणि देखरेखीच्या प्रश्नावरुन प्रमुख मुद्दे उपस्थित केले आहे . सद्यस्थितीत  वाहनांवर ट्रॅकिंग डिव्हाइस ( जीपीएस) बसविण्यात आले असले तरी, घाटामधून स्टॉक वर ही रेती वाहतूक केली जाते त्या वाहनावर जीपीएस नाही. आणि एकाच टिपी वर दिवसभर ही वाहतूक यवतमाळ जिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्यात करण्यात येत आहे. घाटाचे ठिकाण ते सगळ्यात दूरचे ठिकाण अशी टीपी फाडून दिवसभर चालवली जाते. वर्धा नदी आपटी घाट पात्रातून  दिवस रात्र वाळू उपसा करून स्टॉक जेवढा होता तेवढाच केला जात असल्याचे सांगितले जाते. अधिकारी तपासण्यासाठी जरी आले तरी तो स्टॉक दिलेल्या माहितीपेक्षा  थोडा कमी करून दाखवल्या जातो.  ग्रामपंचायत आपटी  ग्रामसेवकांना याबाबत विचारले असता त्यांना कोणताही लेखी आदेश आलेला नाही त्यामुळे आमच्याजवळ कोणतीह...

कृषी उत्पन्न बाजार समितीला शेतकऱ्यांनी भेट दिला चना

कृषी उत्पन्न बाजार समितीला शेतकऱ्यांनी भेट दिला चना

वरोरा 
चेतन लूतडे 

वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांचा चना हे पीक 15 दिवसांपूर्वीच बाजारात आलेले आहे. मात्र सरकारच्या नियमानुसार चना या पिकाला हमीभावानुसार भाव मिळत नसल्याची खंत किशोर डुकरे यांनी व्यक्त केली आहे. 

शेतकऱ्यांनी वारंवार निवेदन देऊन सुद्धा हमीभाव मिळत नसल्याने किशोर डुकरे यांनी आंदोलनाचा इशारा देत चना कृषी उत्पन्न कार्यालयात फेकण्यात येईल असा दावा केला होता. यानंतर पोलिसांनी शेतकऱ्याच्या निवेदनाची दखल घेत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात चोक बंदोबस्त दिला होता. त्यानुसार सोमवारी शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यालय गाठून सचिव चंद्रशेखर शिंदे यांना हमीभावानुसार चना खरेदी करण्याची विनंती केली , मात्र सरकारचे कोणतीही असे आदेश नसल्याने सध्या तारण व्यवस्थित शेतकऱ्यांनी चना ठेवावा अशी विनंती केली.  मात्र खाजगी व्यापाऱ्याकडून मोठ्या प्रमाणात चना खरेदीमध्ये लूट होत असून कमी दराने चना खरेदी होत आहे. यासाठी बाजार समितीने खाजगी व्यापाऱ्यांवर नियंत्रण ठेवावे अशी सूचना करण्यात आली. सोयाबीन पिकाचे पैसे तीन महिन्यांपासून मिळाले नाही त्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांपर्यंत हे पैसे पोहोचवावे अशी निवेदनात मागणी करण्यात आली. 

अशा विविध मागण्यांसाठी किशोर डुकरे यांच्या नेतृत्वात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात चना फेको आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त लागला होता.

Comments