प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

कृषी उत्पन्न बाजार समितीला शेतकऱ्यांनी भेट दिला चना

कृषी उत्पन्न बाजार समितीला शेतकऱ्यांनी भेट दिला चना

वरोरा 
चेतन लूतडे 

वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांचा चना हे पीक 15 दिवसांपूर्वीच बाजारात आलेले आहे. मात्र सरकारच्या नियमानुसार चना या पिकाला हमीभावानुसार भाव मिळत नसल्याची खंत किशोर डुकरे यांनी व्यक्त केली आहे. 

शेतकऱ्यांनी वारंवार निवेदन देऊन सुद्धा हमीभाव मिळत नसल्याने किशोर डुकरे यांनी आंदोलनाचा इशारा देत चना कृषी उत्पन्न कार्यालयात फेकण्यात येईल असा दावा केला होता. यानंतर पोलिसांनी शेतकऱ्याच्या निवेदनाची दखल घेत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात चोक बंदोबस्त दिला होता. त्यानुसार सोमवारी शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यालय गाठून सचिव चंद्रशेखर शिंदे यांना हमीभावानुसार चना खरेदी करण्याची विनंती केली , मात्र सरकारचे कोणतीही असे आदेश नसल्याने सध्या तारण व्यवस्थित शेतकऱ्यांनी चना ठेवावा अशी विनंती केली.  मात्र खाजगी व्यापाऱ्याकडून मोठ्या प्रमाणात चना खरेदीमध्ये लूट होत असून कमी दराने चना खरेदी होत आहे. यासाठी बाजार समितीने खाजगी व्यापाऱ्यांवर नियंत्रण ठेवावे अशी सूचना करण्यात आली. सोयाबीन पिकाचे पैसे तीन महिन्यांपासून मिळाले नाही त्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांपर्यंत हे पैसे पोहोचवावे अशी निवेदनात मागणी करण्यात आली. 

अशा विविध मागण्यांसाठी किशोर डुकरे यांच्या नेतृत्वात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात चना फेको आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त लागला होता.

Comments