प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

रन फोर लेप्रसी कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर विकास आमटे यांच्या हस्ते पारितोषकाचे वितरण


रन फोर लेप्रसी कार्यक्रमाचे आयोजन 

डॉक्टर विकास आमटे यांच्या हस्ते पारितोषकाचे वितरण

वरोरा 
चेतन लूतडे वरोरा 

जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा कुष्ठरोग, तालुका आरोग्य अधिकारी, महारोगी सेवा समिती संचालित आनंद निकेतन महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 'रन फॉर लेप्रसी' कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी करण्यात आले.
कृष्ठरोग प्राचीन काळापासून चालत आलेला आजार आहे तो मुख्यत्वे बॅक्टेरिया पासून होतो. समाजामध्ये आजही फार मोठ्या प्रमाणावर गैरसमजुती आहेत.  कुठल्यातरी पाप आपल्या हातून झाले असेल कृष्ट रोगाची लागण झाली असेल . त्यामुळे अंगावरची चट्टे लपवण्याचा प्रयत्न करतो हा बॅक्टेरियामुळे होणारा आजार असल्यामुळे औषध उपचाराने तो 100% बरा करता येतो.  आणि लागण होणारा आजार असला तरी खूप जास्त कालावधी लागण होण्यासाठी लागतो. औषध उपचारांनी शंभर टक्के बरा होणारा आजार आहे आणि याची जनजागृती लोकांमध्ये यावी लोकांना कुष्ठरोगांबद्दल, पीडित रुग्णांबद्दल आदर निर्माण व्हावा सन्मान निर्माण व्हावा. आणि कुष्ठरोग हे फक्त विभागामार्फत चालवलेला कार्यक्रम न राहता लोक चळवळ व्हावी लोकांनी समोर येऊन झालेल्या आजाराचे औषधी उपचार करावे. यानिमित्ताने आनंदवन महाविद्यालयाच्या प्रांगणात रन फॉर रेप्रसि हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेमध्ये सर्व वयोगटातील स्पर्धकांनी सहभाग दर्शविला. यामध्ये स्पर्धकांना पारितोषिक  डॉक्टर विकास आमटे यांच्या हस्ते देण्यात आले. 
  
यावर्षी चंद्रपूर जिल्ह्यात आपल्याकडे 1500  कृष्टरुग्ण आहेत .जे औषध उपचार घेत आहेत आणि या वर्षात साधारणपणे 1955 नवीन रुग्ण शोधलेले आहेत.याच्यात आनंदाची बाब म्हणजे एकाही कृष्ट रुग्णाला कुठली दुष्टीदोष स्वरूपाची विकृती नाही. सगळे रुग्णांना आपण शंभर टक्के औषध उपचार देत आहोत .

Comments