पर्यावरण समितीचे रेती प्रकल्पावर दुर्लक्ष. जीपीएस, सीसीटीव्ही आणि हेल्पलाइनची चेक करण्याची व्यवस्था कुचकामी ठरत आहे.

पर्यावरण समितीचे रेती प्रकल्पावर दुर्लक्ष.  जीपीएस, सीसीटीव्ही आणि हेल्पलाइनची चेक करण्याची व्यवस्था कुचकामी ठरत आहे. वरोरा /चेतन लूतडे:  वनी-मारेगाव तालुक्यातील वाळू घाटात अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याची टीका नागरिकांनी केली आहे. नागरिकाने रेती घाटांवरील नियमावली आणि देखरेखीच्या प्रश्नावरुन प्रमुख मुद्दे उपस्थित केले आहे . सद्यस्थितीत  वाहनांवर ट्रॅकिंग डिव्हाइस ( जीपीएस) बसविण्यात आले असले तरी, घाटामधून स्टॉक वर ही रेती वाहतूक केली जाते त्या वाहनावर जीपीएस नाही. आणि एकाच टिपी वर दिवसभर ही वाहतूक यवतमाळ जिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्यात करण्यात येत आहे. घाटाचे ठिकाण ते सगळ्यात दूरचे ठिकाण अशी टीपी फाडून दिवसभर चालवली जाते. वर्धा नदी आपटी घाट पात्रातून  दिवस रात्र वाळू उपसा करून स्टॉक जेवढा होता तेवढाच केला जात असल्याचे सांगितले जाते. अधिकारी तपासण्यासाठी जरी आले तरी तो स्टॉक दिलेल्या माहितीपेक्षा  थोडा कमी करून दाखवल्या जातो.  ग्रामपंचायत आपटी  ग्रामसेवकांना याबाबत विचारले असता त्यांना कोणताही लेखी आदेश आलेला नाही त्यामुळे आमच्याजवळ कोणतीह...

*मुख्यमंत्र्यांविरोधात शेतकऱ्यांनी केली तक्रार** *मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्या, अन्यथा आंदोलन*

*मुख्यमंत्र्यांविरोधात शेतकऱ्यांनी केली तक्रार**
 *मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्या, अन्यथा आंदोलन*


वरोडा: शाम ठेंगडी

    वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज 20 फरवरी रोज गुरुवारला त्यांच्या विविध समस्याबाबत मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री यांनी आपली फसवणूक केल्याची तक्रार वरोड्याचे तहसीलदार व पुलिस स्टेशन मध्ये  केली. आपल्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास पुढील महिन्यात चंद्रपूर नागपूर महामार्ग रोखून धरण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
       मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री  यांनी निवडणुकीपूर्वी शेतकरी यांना प्रलोभन देऊन मते मागितली.तसेच डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना कमीत कमी एक महिना व जास्तीत जास्त सहा महिन्यापर्यंत विद्युत जोडणी करणे बंधनकारक असताना पाच ते सहा वर्ष लोटून सुद्धा विद्युत जोडणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांना अडचणीचे होत असून त्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री आणि जिल्हाचे पालकमंत्री यांच्या विरोधात वरोड्याचे  तहसीलदार  योगेश कौटकर यांच्याकडे निवेदन दिले. 
  ‌.    शेतकरी नेते  किशोर डुकरे यांच्या नेतृत्वामध्ये निवेदन देऊन त्वरित समस्या सोडविण्यात यावा अन्यथा येथील 10 मार्च ला नागपूर चंद्रपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केल्या जाईल. असा इशारा दिला असून याला जबाबदार प्रशासन राहील असे  त्यांनी सांगितले. 
    शेतकऱ्यांच्या मागण्याचे  निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात  अक्षय बोंदुलवार, विशाल देठे, श्रीकृष्ण देवतळे , माधव जीवतोडे, गोविंदा पाकमोडे, अंकित देठे, आकाश धवणे, सुनील चिडे, बालू आवारी, नितीन मोरे, प्रेमानंद सूर आधी शेतकऱ्यांचा समावेश होता.

Comments