कॅन्सरशी झुंज देणाऱ्या रोहीला ट्रस्टचा आधार; ‘बाबा आमटे आरोग्य अभियान’ अंतर्गत मदतीचा हातमाणुसकी जपणाऱ्या उपक्रमातून १० वर्षीय चिमुकलीच्या उपचारांना बळ

कॅन्सरशी झुंज देणाऱ्या रोहीला ट्रस्टचा आधार; ‘बाबा आमटे आरोग्य अभियान’ अंतर्गत मदतीचा हात माणुसकी जपणाऱ्या उपक्रमातून १० वर्षीय चिमुकलीच्या उपचारांना बळ बातमी: चंद्रपूर : सामाजिक बांधिलकी जपत कार्यरत असलेल्या स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट, चंद्रपूर तर्फे कॅन्सरशी झुंज देणाऱ्या १० वर्षीय कुमारी रोही सिंह हिला मदतीचा हात देण्यात आला आहे. ‘श्रद्धेय बाबा आमटे आरोग्य अभियान’ अंतर्गत ही मदत करण्यात आली असून, तिच्या उपचारांसाठी महत्त्वाचे सहकार्य मिळाले आहे. मुळचे उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यातील नागेंद्र सिंह हे सध्या नागपूर येथे उदरनिर्वाहासाठी वास्तव्यास आहेत. त्यांची अल्पवयीन मुलगी रोही सिंह हिला हाडांचा कॅन्सर (Bone Cancer) झाला असून, या गंभीर आजारामुळे संपूर्ण कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. अशा कठीण परिस्थितीत ट्रस्टने पुढाकार घेत तिच्या उपचारांसाठी आर्थिक तसेच नैतिक आधार दिला आहे. या उपक्रमातून केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर एका निरागस मुलीला नव्याने जगण्याची आशा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. रोही ही या आजारावर मात करून पुन्हा आनंदाने जीवन...

*मुख्यमंत्र्यांविरोधात शेतकऱ्यांनी केली तक्रार** *मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्या, अन्यथा आंदोलन*

*मुख्यमंत्र्यांविरोधात शेतकऱ्यांनी केली तक्रार**
 *मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्या, अन्यथा आंदोलन*


वरोडा: शाम ठेंगडी

    वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज 20 फरवरी रोज गुरुवारला त्यांच्या विविध समस्याबाबत मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री यांनी आपली फसवणूक केल्याची तक्रार वरोड्याचे तहसीलदार व पुलिस स्टेशन मध्ये  केली. आपल्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास पुढील महिन्यात चंद्रपूर नागपूर महामार्ग रोखून धरण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
       मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री  यांनी निवडणुकीपूर्वी शेतकरी यांना प्रलोभन देऊन मते मागितली.तसेच डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना कमीत कमी एक महिना व जास्तीत जास्त सहा महिन्यापर्यंत विद्युत जोडणी करणे बंधनकारक असताना पाच ते सहा वर्ष लोटून सुद्धा विद्युत जोडणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांना अडचणीचे होत असून त्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री आणि जिल्हाचे पालकमंत्री यांच्या विरोधात वरोड्याचे  तहसीलदार  योगेश कौटकर यांच्याकडे निवेदन दिले. 
  ‌.    शेतकरी नेते  किशोर डुकरे यांच्या नेतृत्वामध्ये निवेदन देऊन त्वरित समस्या सोडविण्यात यावा अन्यथा येथील 10 मार्च ला नागपूर चंद्रपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केल्या जाईल. असा इशारा दिला असून याला जबाबदार प्रशासन राहील असे  त्यांनी सांगितले. 
    शेतकऱ्यांच्या मागण्याचे  निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात  अक्षय बोंदुलवार, विशाल देठे, श्रीकृष्ण देवतळे , माधव जीवतोडे, गोविंदा पाकमोडे, अंकित देठे, आकाश धवणे, सुनील चिडे, बालू आवारी, नितीन मोरे, प्रेमानंद सूर आधी शेतकऱ्यांचा समावेश होता.

Comments