पर्यावरण समितीचे रेती प्रकल्पावर दुर्लक्ष. जीपीएस, सीसीटीव्ही आणि हेल्पलाइनची चेक करण्याची व्यवस्था कुचकामी ठरत आहे.

पर्यावरण समितीचे रेती प्रकल्पावर दुर्लक्ष.  जीपीएस, सीसीटीव्ही आणि हेल्पलाइनची चेक करण्याची व्यवस्था कुचकामी ठरत आहे. वरोरा /चेतन लूतडे:  वनी-मारेगाव तालुक्यातील वाळू घाटात अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याची टीका नागरिकांनी केली आहे. नागरिकाने रेती घाटांवरील नियमावली आणि देखरेखीच्या प्रश्नावरुन प्रमुख मुद्दे उपस्थित केले आहे . सद्यस्थितीत  वाहनांवर ट्रॅकिंग डिव्हाइस ( जीपीएस) बसविण्यात आले असले तरी, घाटामधून स्टॉक वर ही रेती वाहतूक केली जाते त्या वाहनावर जीपीएस नाही. आणि एकाच टिपी वर दिवसभर ही वाहतूक यवतमाळ जिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्यात करण्यात येत आहे. घाटाचे ठिकाण ते सगळ्यात दूरचे ठिकाण अशी टीपी फाडून दिवसभर चालवली जाते. वर्धा नदी आपटी घाट पात्रातून  दिवस रात्र वाळू उपसा करून स्टॉक जेवढा होता तेवढाच केला जात असल्याचे सांगितले जाते. अधिकारी तपासण्यासाठी जरी आले तरी तो स्टॉक दिलेल्या माहितीपेक्षा  थोडा कमी करून दाखवल्या जातो.  ग्रामपंचायत आपटी  ग्रामसेवकांना याबाबत विचारले असता त्यांना कोणताही लेखी आदेश आलेला नाही त्यामुळे आमच्याजवळ कोणतीह...

*शिवजयंती निमित्ताने किल्ला स्वच्छता अभियान**इको-प्रोसह राजीव गांधी अभियांत्रिकी, समाजकार्य महाविद्यालय व सारथी इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांचा सहभाग*


*शिवजयंती निमित्ताने किल्ला स्वच्छता अभियान*

*इको-प्रोसह राजीव गांधी अभियांत्रिकी, समाजकार्य महाविद्यालय व सारथी इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांचा सहभाग*

अंकुश अवथे चंद्रपूर 

चंद्रपूर: इको-प्रो संस्थेच्या माध्यमाने शिवजयंती निमित्ताने चंद्रपूर जिल्हा परकोट स्वच्छता अभियानाची सुरुवात करण्यात आली. आज बगड खिडकी ते अंचलेश्वर गेट पर्यंतच्या हेरिटेज वॉकच्या मार्गाची स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले. आज स्थानिक राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय, डॉ सुशिलाबाई रामचंद्र मामीडवार समाजकार्य महाविद्यालय व सारथी इन्स्टिट्यूट च्या विद्यार्थ्यांनी श्रमदानात सहभाग घेतला.

या अभियानात महाविद्यालयीन विद्यार्थी व अन्य युवकांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. लवकरच बगड खिडकी ते अंचलेश्वर गेट पर्यंतच्या हेरिटेज वॉक म्हणजे चंद्रपूर किल्ला व ऐतिहासिक वास्तू पर्यटनाला सुरुवात करण्यात येईल. यापूर्वी इको-प्रो ने चंद्रपूर किल्ला स्वच्छता अभियान सलगएक हजार वीस दिवस नियमित राबविले तसेच चंद्रपूर पर्यटनास चालना मिळावी म्हणून किल्ला पर्यटन सुरू केले होते. आज हेरिटेज वॉक मार्गातील स्वच्छता करण्यात आली, बुरुज 4 व त्याचा परिसर स्वच्छ करण्यात आला.

स्वच्छता अभियान नंतर शिवजयंती निमित्त छोटा कार्यक्रम घेण्यात आला. आपला स्थानिक ऐतिहासिक वारसा आणि युवकांची भूमिका, शिवाजी महाराजांचे खरे स्मारक असलेले गडकिल्ले त्यांचे महत्व आणि संरक्षण-संवर्धनाची गरज, गोंडकालीन इतिहासाविषयी आणि किल्ला संवर्धनासाठी सुरू असलेले प्रयत्न याविषयी इको-प्रो चे अध्यक्ष बंडु धोतरे  यांनी माहिती दिली. या अभियानात  प्रा. प्रमोद सहारे, संस्थेचे अध्यक्ष बंडु धोतरे, सुमित कोहळे, अभय अमृतकर, कुणाल देवगिरकर, राजू काहिलकर, मनीष गावंडे, सचिन धोतरे, मोरेश्वर मडावी, रुद्राक्ष धोतरे तर भाविक गोरे, रोहित सत्यपाल, गणेश दाढे, पूजा देऊलकर, गौरी कोहपरे, वैभवी रंगनकर, आकाश नागोलकर, कोमल घोडे, संकेत झाडे व अन्य विद्यार्थी सहभागी होते.

Comments