वरोडा :- शाम ठेंगडी
एकत्रित महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनाचे कार्यरत आरोग्यमित्र यांचे आज 18 फरवरीपासून राज्यव्यापी बेमुदत धरणे आंदोलन सुरू झाले आहेत. या या आंदोलनात वरोरा येथील आरोग्यमित्रही सहभागी झाल्याने येथील कामकाज ठप्प झाले आहे.
राज्य आरोग्य हमी सोसायटी व सहाय्य संस्था यांनी आरोग्यमित्राच्या मागण्यांवर लवकरात लवकर निर्णय घेऊन आरोग्यमित्रांना न्याय द्यावे अशी विनंती पूर्वक निवेदन आरोग्यमित्रांकडून देण्यात आले आहेत. यावर योग्य निर्णय घेण्यात आले नाही. आरोग्यमित्र हे पदविधर असून, योजनेचे योग्य कौशल्य असलेले तसेच रुग्णाचे योग्य समुपदेश करणे. हे सर्व काम आरोग्यमित्र करीत असतो. त्यामुळे दिनांक 23 ऑगस्ट 24 ला जीवनदायी भवन मुंबई येथे झालेल्या बैठकीत सीईओ सर यांनी आश्वासन दिले होते .परंतु त्यावर काही निर्णय घेण्यात आले नाही.यासाठी आरोग्यमित्र संघटनेकडून पत्रव्यवहार करण्यात आले.परंतु त्यावर राज्य आरोग्य हमी सोसायटी व सहाय्य संस्था यांनी काहीच निर्णय घेतले नाही. त्यामुळे 12 फरवरी 25 ला संघटनेकडून संपाची घोषणा करण्यात आली होती.
यानंतर राज्य आरोग्य हमी सोसायटी व सहाय्य संस्था 7 फरवरी 2025 ला जीवनदायी भवन मुंबई येथे बैठक झाली. त्यात 10 दिवसाची वेळ मागण्यात आली. ती सुद्धा संघटनेकडून देण्यात आली. पण त्यावर १७ फरवरीपर्यंत निर्णय घेण्याची मुदत देण्यात आली.परंतु त्यावर योग्य निर्णय न झाल्याने शेवटी आज 18 फरवरी 25 पासून महाराष्ट्र आरोग्यमित्र संघटनेकडून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारण्यात आला आहे.
चंद्रपूर आरोग्यमित्र संघटने कडून सुद्धा चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय समोर संप करण्यात येत आहे. संपाला सिटूच्या चंद्रपूर जिल्हा संघटनेचे सदस्य कॉ. किशोर जामदार , कॉ. राजेश पिंजरकर , कॉ. अरुण भेलके यांनी मार्गदर्शन केले. तसेच आरोग्यमित्र संघटनेकडून जिल्हाधिकारी विनय गौडा यांना निवेदन देण्यात आले.
तरी आरोग्यमित्र यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात याव्यात तोपर्यंत हे संप मागे घेणार नाही असे संघटनेचे अध्यक्ष कॉ. डॉ. डी. एल. कराड यांनी सांगितले
Comments
Post a Comment