प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

*जिल्हाधिका-यांनी घेतला नोंदणीकृत धर्मादाय रुग्णालयांचा आढावा*

*जिल्हाधिका-यांनी घेतला नोंदणीकृत धर्मादाय रुग्णालयांचा आढावा*

चंद्रपूर, दि. 13 : सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय येथील नोंदणीकृत धर्मादाय रुग्णालयांच्या समितीचा आढावा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला सहायक जिल्हाधिकारी कश्मिरा संख्ये, सहायक धर्मादाय आयुक्त प्रियंका करवंदे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ.  भास्कर सोनारकर, डॉ. किरण देशपांडे, वैद्यकीय क्षेत्रातील मंजुषा भगत, दीपमाला गायकवाड, भूपेंद्रकुमार उपासे, क्राइस्ट रुग्णालयाचे डॉ. जोसेफ, ब्रह्मपुरी येथील ख्रिस्तानंद रुग्णालयाच्या एलिमाबेथ आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, धर्मादाय रुग्णालयांनी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजनेविषयी सामान्य जनतेला माहिती द्यावी. तसेच जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालय शासनाच्या पॅनलवर येण्यासाठी त्वरित प्रस्ताव पाठवावा. जेणेकरून उपचारासाठी निधी कमी पडणार नाही.

सहायक धर्मादाय आयुक्त प्रियंका करवंदे यांनी, धर्मादाय रुग्णालय योजनेचे लाभार्थी, त्यांचे निकष याबाबत माहिती दिली. रुग्णांवर उपचार करण्यासाठी निधी कमी पडतो तसेच रुग्ण दाखल करताना दस्तऐवजाबाबत येणाऱ्या अडचणीबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. धर्मादाय रुग्णालयाबाबत एकही तक्रार प्रलंबित नसून, बेड नेहमी अपडेट केले जातात, तसेच 10 टक्के बेड राखीव ठेवले जातात, अशी माहिती श्रीमती करवंदे यांनी दिली.

०००००

Comments