कत्तलीसाठी नेली जात असलेली ३० जनावरे वाचवली; पोलिसांचा मोठा छापा

कत्तलीसाठी नेली जात असलेली ३० जनावरे वाचवली; पोलिसांचा मोठा छापा. जनावरांची अवैध वाहतूक उधळली, १९.५० लाखांचा मुद्देमाल जप्त बातमी:chetan lutade,warora/2/5/26 वरोरा (प्रतिनिधी) : वरोरा पोलीसांनी नाईट गस्तीदरम्यान मोठी कारवाई करत ३० गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक उधळून लावली असून सुमारे १९ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून इतर साथीदार पसार झाले आहेत. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १ मे रोजी पहाटे ४.३५ वाजताच्या सुमारास वणी-चंद्रपूर मार्गावरील शेंबळ नाका परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी नागपूरकडून येणारा आयशर कंटेनर (क्र. HR 55 T 4329) संशयास्पदरीत्या येताना दिसला. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा दिल्यानंतर ट्रकमधील दोन इसम उडी मारून झुडपात पळून गेले, तर चालकाला ताब्यात घेण्यात आले. वाहनाची पंचासमक्ष झडती घेतली असता, ट्रकच्या मागील भागात ३० गोवंशीय बैल अत्यंत दाटीवाटीने, कोणतीही चारा-पाणी व्यवस्था न करता बांधून ठेवलेले आढळले. तसेच वाहतुकीसाठी आवश्यक परवाने व कागदपत्रे नसल्याचेही स्पष्ट झाले. ...

मुलाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या**भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील घटना*

* मुलाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या*

*भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील घटना*

फक्त बातमी 

 भद्रावती तालुक्यातील चंन्दनखेडा येथील  मुलाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना  दिनांक 24 ला उघडकीस आली. अरोहन माणिक बागेसर,वय 16 वर्ष, राहणार चंदनखेडा असे या मृतक मुलाचे नाव असून  शुल्लक कारणावरून रागावून मृतक अरोहण हा दिनांक 22 ला घरून निघून गेला होता. घरच्या लोकांनी दिनांक 23 ला तो बेपत्ता असल्याची तक्रार भद्रावती पोलिसात दाखल केली. मात्र 24 ला दुपारी 12.30 वाजता त्याचा मृतदेह गावातील सरकारी दवाखान्या जवळील हनुमान मंदिर परिसरातील विहिरीत आढळून आले. ही घटना कळतात भद्रावती पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मर्ग दाखल केला आहे.

Comments