वाढत्या उन्हामुळे शाळा - महाविद्यालये सकाळच्या सत्रात 11 वाजेपर्यंतच ठेवाØ जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी निर्गमित केले आदेश

वाढत्या उन्हामुळे शाळा - महाविद्यालये सकाळच्या सत्रात 11 वाजेपर्यंतच ठेवा  जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी निर्गमित केले आदेश चंद्रपूर, दि. 19 : जिल्ह्यात सध्या वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 11 मार्च 2026 रोजी आयोजित बैठकीत शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद यांना शाळा सकाळ सत्रात घेण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाचा तीव्र तडाखा जाणवत असून तापमान 44 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः उष्माघात (सन स्ट्रोक) व इतर उष्णतेशी संबंधित आजारांचा धोका लक्षात घेता विद्यार्थ्यांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. दुपारच्या कडक उन्हात शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी जाताना होणारा त्रास टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या (शासकीय, अनुदानित व खासगी) शाळा व महाविद्यालयांच्या वेळांमध्ये तात्पुरता बदल कर...

*रोटरी क्लब वरोरा तथा शेषरत्न बहुउद्देशीय संस्था तर्फे ८ डिसेंबरला भव्य रक्तदान शिबिर*

*रोटरी क्लब वरोरा तथा शेषरत्न बहुउद्देशीय संस्था तर्फे ८ डिसेंबरला भव्य रक्तदान शिबिर*


वरोरा : - येथील शेषरत्न बहुउद्देशीय संस्था आणि रोटरी क्लब तर्फे रविवार दि.८ डिसेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.सरकारी रक्तपेढी चंद्रपूर  यांच्या मार्फत डोंगरवार चौकातील महावीर भवन येथे सकाळी ९ ते दुपारी ३ वाजे पर्यंत रक्तदान शिबीर आयोजित होणार आहे.
काही महिन्यांपासून चंद्रपूर, वर्धा, नागपूर या शहरातील सरकारी तसेच खाजगी रक्तपेढी मधे  २० ते २५  टक्के  रक्तच उपलब्ध होत आहे. ही कमतरता भरून काढण्यासाठी शैषरत्न बहुउद्देशीय संस्था वरोरा आणि रोटरी क्लब वरोरा यांनी पुढाकार घेतला आहे. या दोन्ही संस्थेच्या वतीने रविवार दि. ८ डिसेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात जास्तीत जास्त संख्येने रक्तदात्यांनी स्वतःचे कर्तव्य समजून  पुढाकार घेऊन रक्तदान करावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. थॅलेसेमिया, सिकलसेल, कर्करोग, डेंग्यू, डिलिव्हरी रुग्णां सोबतच अपघात ग्रस्त रुग्णांना रक्ताची मोठी आवश्यकता असते. वेळेवर रक्त उपलब्ध न झाल्यास त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न असतो. यामुळे सदर  शिबिरात रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान करावे असे आवाहन *धिरज लाकडे* अध्यक्ष शेषरत्न बहुउद्देशीय संस्था व *बंडु भाऊ देऊळकर* अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ वरोरा यांनी केले आहे.

Comments