प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराचा निषेध, चंद्रपूर शहरात काढण्यात आली एकता रॅली

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराचा निषेध, चंद्रपूर शहरात काढण्यात आली एकता रॅली

अकूंश अवथे चंद्रपूर 

बांगलादेशातील हिंदू समाजावर मागील अनेक महिन्यापासून अत्याचार सुरु आहे . ज्यात हल्ले, हत्या, लुटमार, जाळपोळ आणि महिलांचा अमानुष छळ, हिंदू आणि अल्पसंख्यांकांच्या धर्मिक स्थळांची विटंबणा सुरु केली  आहे. या घटनेचा   विरोध करण्यासाठी आज सोमवारी चंद्रपूर शहरात बंगाली समाज एकता संघर्ष समितीचा वतीने एकता रॅली काढण्यात आली . हि एकता रॅली  बंगाली कॅम्प  दुर्गा माता मंदिर  येथून निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली . या एकता रॅलीत  बंगाली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाधिकारी  विनय गौडा  यांना बंगाली समाज एकता संघर्ष समितीचा वतीने  निवेदन देण्यात  आले.



Comments