संस्कार भारती पब्लिक स्कूलची वरोरा तालुक्यात आघाडी; अदिती गायकवाड ९६ टक्क्यांसह प्रथम, शाळेचा निकाल १०० टक्के

संस्कार भारती पब्लिक स्कूलची वरोरा तालुक्यात आघाडी; अदिती गायकवाड ९६ टक्क्यांसह प्रथम, शाळेचा निकाल १०० टक्के वरोरा, दि. १६ एप्रिल: येथील संस्कार भारती पब्लिक स्कूलने यंदाच्या शैक्षणिक सत्रातील परीक्षेत तालुकास्तरावर आपला दबदबा कायम राखत १०० टक्के निकालाची नोंद केली आहे. शाळेची ही कामगिरी उल्लेखनीय ठरली असून विद्यार्थिनी अदिती गायकवाड हिने तब्बल ९६.०० टक्के गुण प्राप्त करून वरोरा तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. शाळेच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, यावर्षी एकूण ९० विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यापैकी सर्वच्या सर्व ९० विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला असून शाळेचा निकाल १००% लागला आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये तब्बल २५ विद्यार्थ्यांनी प्राविण्य (डिस्टिंक्शन) मिळवत शाळेच्या नावलौकिकात भर घातली आहे. या अभूतपूर्व यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, सचिव, प्राचार्य तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. शाळेच्या वतीने अदिती गायकवाड हिचा विशेष सत्कार करण्यात येणार असून तिच्या यशामुळे संपूर्ण वरोरा परिसरात शाळेचे ...

*सी.डी.सी.सी.बँकेची परीक्षा नव्याने घ्या**सामाजिक कार्यकर्ते शुभम आमने यांची जिल्हाधिकाऱ्या कडे मागणी

*सी.डी.सी.सी.बँकेची परीक्षा नव्याने घ्या*
*सामाजिक कार्यकर्ते शुभम आमने यांची जिल्हाधिकाऱ्या कडे मागणी 

सारथी ठाकूर, वरोरा 

वरोरा :- सी.डी.सी.सी बँक चंद्रपूर ची शिपाई कर्मचारी भरती ची प्रकिया सुरु आहे. राज्यभरातून ऐकतीस हजार उमेदवारांनी अर्ज केले आहे. तरी त्यांची परीक्षा दि. २१ डिसेंबर २०२४ रोजी वेळापत्रक मध्ये  दिलेल्या ठिकाणी सुरु झाली असता त्या ठिकाणी 
परीक्षा चालू झाली असता काही प्रश्न सोडविताचं परीक्षा बंद पडली आणि सोडविलेले प्रश्नाचं उत्तर निवडले असता ते उत्तर येत येत नसून ते दुसर उत्तर होत  होते. या सर्वं भोळ कारभारात उमेदवारांच आर्थिक नुकसान झालं असून प्रवासाचा त्रास देखील सहन करावा लागला आहे ५०० कि.मी.पेक्षा जास्त अंतरावर परीक्षा केंद्र दिल्यामुळे तो त्रास सहन करावा लागला आहे. सी.डी.सी.सी. बँक परीक्षा घोटाळा संदर्भात चौकशी करून दोषी वर कारवाई करणे आणि खाली उमेदवारांच्या मागण्या पूर्ण करा अशी विनंती जिल्हाधिकारी यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत केली आहे.
मागण्या 
1) समंधित कंपनी वर कार्यवाही करा 
2) सर्व बँक भरती प्रकियेची चौकशी करून दोषीवर कायदेशीर कार्यवाही करा.
3) उमेदवाराला ५०० कि. मी. वरून एका जिल्ह्यातून दुसऱ्या  जिल्ह्यात पैसे खर्च करून प्रवास करत उमेदवार परीक्षा ठिकाणी जाव्ह लागलं असून त्यांच आर्थिक नुकसान झाल.तरी ते परीक्षा कंपनी कडून वसून करून उमेदवारांना  रक्कम ५०००/ परत द्या.
४) सर्वं भरती परीक्षा रद्द करून परत दुसऱ्याने परीक्षा घ्या 
५) उमेदवारांच्या परीक्षा १०० कि. मी. अंतराच्या आत घ्या.इ. मागण्या पूर्ण करा अशी विनंती सामाजिक कार्यकर्ते शुभम आमने यांनी केली. त्यावेळी अन्य परीक्षा उमेदवार देखील मोठया संख्येने उपस्थित होते.

Comments