प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

वणी वरोरा राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कारने दुचाकीस्वारास चिरडले.

वणी वरोरा राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कारने दुचाकीस्वारास चिरडले

शेंबळ गावाजवळ घटना 

वरोरा
वरोर्‍यावरून शेंबळ येथील नातेवाईकाच्या भेटीला जात असलेल्या दुचाकीस्वारला भरधाव वेगात असलेल्या हेक्टोर कारने जबर धडक दिली. यात दुचाकी स्वराचा जगीचा मृत्यू झाल्याची घटना वणी वरोरा राष्ट्रीय महामार्गावरील शेंबळ गावाजवळ दुपारी 12 वाजताच्या सुमारास घडली. प्रवीण रामकृष्ण वाभीटकर (45) रा. वरोरा असे मृतकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार वरोरा शहरातील कापड व्यावसायिक प्रवीण वाभीटकर हे शेंबळ येथे राहत असलेल्या नातेवाईकांकडे एका कार्यक्रमासाठी हीरो होंडा दुचाकी क्रमांक एमएच 34 एसी 2839 ने जात असताना शेंबळ गावाच्या वळणावर वणी कडून वरोरा कडे येत असलेली  भरधाव हेक्टोर कार क्रमांक एमएच 29 बीपी 7722 या वाहनाने  दुचाकीला जबर धडक दिली. यात दुचाकीस्वार प्रवीण वाभीटकर यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळ वरुन कारचालक पसार झाले होते. प्रवीण वाभीटकर यांच्या पश्चात पत्नी, व तीन अविवाहित मुली आहे. घरचा करता व्यक्तीच गेल्याने त्यांच्या कुटुंबावर दु:खचा डोंगर कोसळला असून सर्वत्र शोककळा पसरली आहे. 

अल्पावधीत तयार करण्यात आलेल्या  या वणी वरोरा राष्ट्रीय महामार्गावर सुरक्षेच्या दृष्टीकोणातून कोणतीही उपाययोजना केल्या गेली नाही. स्पीड लिमिट बोर्ड, ब्लिंकर लाईट, रिप्लेक्टर रेडियम ब्लॉक सह आदी त्रुट्या असल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहे. 

Comments