वरोरा येथे खूनाचा प्रयत्न: फोन का उचलत नाही म्हणून विवाहितेवर चाकूहल्ला

वरोरा येथे खूनाचा प्रयत्न: फोन का उचलत नाही म्हणून विवाहितेवर चाकूहल्ला वरोरा, ता. ४ मार्च : "तू माझ्याशी बोलत का नाही? माझा फोन का उचलत नाही?" असे म्हणत एका तरुणाने एका विवाहित महिलेवर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी (दि. ३ मार्च) सायंकाळी उघडकीस आली. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरातील यात्रा वार्ड प्रभाग सात मधील परिसरात ही घटना घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, ४० वर्षीय राखी अजय लिहितकर या सहा वर्षांपूर्वी भद्रावती येथील एका पेट्रोल पंपावर कार्यरत होत्या. तेथेच त्यांची ओळख विक्की बावणे याच्याशी झाली होती. तेव्हापासून विक्की हा राखी यांना भेटण्यासाठी येत असे आणि वारंवार फोन करून त्रास देत असे. या त्रासाला कंटाळून राखी यांनी याबाबत आपले पती अजय लिहितकर यांना माहिती दिली. अजय यांनी विक्कीला ताडून पुन्हा फोन न करण्याची धमकी दिली. मात्र, धुळवंदनाच्या दिवशी विक्की हा थेट राखी यांच्या घरी पोहोचला. राखी यांनी दरवाजा उघडताच, विक्कीने "तू माझा फोन का उचलत नाही? तुझा मर्डर करून टाकीन," अशी भीषण धमकी देत कंबरेतून चाकू काढून...

पिक विम्याचे पैसे तात्काळ द्या- खासदार प्रतिभा धानोरकरहिवाळी अधिवेशन 2024

पिक विम्याचे पैसे तात्काळ द्या- खासदार प्रतिभा धानोरकर
हिवाळी अधिवेशन 2024

फक्त बातमी 

दिल्ली येथे लोकसभेचे हिवाळी अधिवेशन सुरु असून विविध प्रश्नांच्या माध्यमातून खासदार प्रतिभा धानोरकर ह्या सरकार चे लक्ष वेधून घेत आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान सन 2023 ची प्रधानमंत्री पिक विम्याची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांना मिळाली नसल्याचे सरकार च्या लक्षात आणून दिले.

खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिल्ली येथे लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात विविध विषयाच्या अनुषंगाने सरकार ला धारेवर धरले असून कृषी व शेतकरी विषयाच्या संदर्भात त्यांनी आक्रमकपणे आपले प्रश्न मांडले आहेत. किटकनाशकांमुळे अनेक शेतकऱ्यांचे व त्यांच्या पाल्यांचे मृत्यु होत असल्याचे सरकार च्या निर्दशनास खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आणून दिले. तसेच किटकनाशकामुळे होणारे दुष्परीणामांसाठी सरकार ने उपाययोजना कराव्यात. त्यासोबतच अशा प्रकरणात दवाखान्यांना देखील आवश्यक सूचना द्याव्यात या संदर्भात खासदार धानोरकर यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. त्यासोबतच 2023 मधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या पिक विम्याचे पैसे अद्यापही मिळाले नसल्याचे सभागृहात खासदार धानोरकर यांनी सांगितले. संबंधीत पिक विम्याचे पैसे तात्काळ देण्यात यावे व संबंधीत कंपनीवर कार्यवाही करावी अशी मागणी देखील खासदार धानोरकर यांनी सभागृहात केली. संबंधीत कंपनीची मुजोरी या सरकार ने बंद करावी व शेतकाऱ्यांना न्याय द्याव, अशी देखील विनंती सरकार कडे केली.

Comments