मुख्यमंत्री येणार म्हणून डांबरीकरणाला सुरुवात; भद्रावतीतील रस्त्याच्या कामावर गावकऱ्यांचा निशाणा

मुख्यमंत्री येणार म्हणून डांबरीकरणाला सुरुवात; भद्रावतीतील रस्त्याच्या कामावर गावकऱ्यांचा निशाणा Instagram link ,view for reel चंद्रपूर / भद्रावती, ता. १४ मार्च: मुख्यमंत्री एका कार्यक्रमासाठी येणार असल्याचे वृत्त समोर येताच चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील ढोरवाचा-पिपरी डांबरी रस्त्याचे काम प्रशासनाने जोरात सुरू केले आहे. मात्र, या घडामोडीमुळे स्थानिक गावकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली आहे. पंधरा वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या या रस्त्याचे काम अचानक सुरू केल्याबद्दल ग्रामस्थांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. पंधरा वर्षांपासून दुर्लक्षित. स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, ढोरवाचा ते पिपरी दरम्यानचा हा रस्ता गेली पंधरा वर्षे प्रचंड जीर्णावस्थेत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वेळोवेळी ग्रामपंचायतीमार्फत तसेच ग्रामस्थांनी स्वतःहून संबंधित विभागाकडे लेखी निवेदने दिली होती. मात्र, प्रशासनाने  त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे पावसाळ्यात तर हा रस्ता चिखलाचा तलाव बनत असे आणि नागरिकांची प्रचंड कुचंबणा व्हायची. राज्याचे मुख्यमंत्री १४ रोजी (शनि...

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 1159 प्रकरणे यशस्वीपणे निकाली*

*राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 1159 प्रकरणे यशस्वीपणे निकाली*

अकूंश अवथे चंद्रपूर 

चंद्रपूर, दि. 16 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा एस. एस. भीष्म यांच्या मार्गदर्शनाखाली 14 डिसेंबर 2024 रोजी चंद्रपूर जिल्हा न्यायालय व सर्व तालुक्यातील न्यायालयामध्ये घेण्यात आलेल्या  राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये  1,159 प्रकरणे यशस्वीपणे निकाली काढण्यात आली. 
सदर लोक अदालतीमध्ये प्रलंबित 8,405 न्यायालयीन प्रकरणे व दाखलपूर्व 16,414 प्रकरणे  ठेवण्यात आली होती. प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांपैकी 640 प्रकरणे तर दाखलपूर्व प्रकरणांपैकी 519 अशी एकूण 1159 निकाली काढण्यात आली. 
प्रलंबित प्रकरणांमध्ये मोटार वाहन अपघात नुकसान भरपाईची 15 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून नुकसान भरपाई रक्कम 2 कोटी 90 लक्ष 70 हजार रुपये वसुल करण्यात आले. तर धनादेश प्रकरणांपैकी 96 प्रकरणे निकाली काढण्यात आली. कामगार न्यायालयातील 2 प्रकरणे निकाली काढण्यात आली. 
चंद्रपूर जिल्हयातील सर्व न्यायालयात लोक अदालत यशस्वी होण्यासाठी सर्व न्यायाधीश, सर्व वकील, सर्व न्यायालयीन कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांनी सहकार्य केले, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी यांनी दिली.

Comments