प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 1159 प्रकरणे यशस्वीपणे निकाली*

*राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 1159 प्रकरणे यशस्वीपणे निकाली*

अकूंश अवथे चंद्रपूर 

चंद्रपूर, दि. 16 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा एस. एस. भीष्म यांच्या मार्गदर्शनाखाली 14 डिसेंबर 2024 रोजी चंद्रपूर जिल्हा न्यायालय व सर्व तालुक्यातील न्यायालयामध्ये घेण्यात आलेल्या  राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये  1,159 प्रकरणे यशस्वीपणे निकाली काढण्यात आली. 
सदर लोक अदालतीमध्ये प्रलंबित 8,405 न्यायालयीन प्रकरणे व दाखलपूर्व 16,414 प्रकरणे  ठेवण्यात आली होती. प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांपैकी 640 प्रकरणे तर दाखलपूर्व प्रकरणांपैकी 519 अशी एकूण 1159 निकाली काढण्यात आली. 
प्रलंबित प्रकरणांमध्ये मोटार वाहन अपघात नुकसान भरपाईची 15 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून नुकसान भरपाई रक्कम 2 कोटी 90 लक्ष 70 हजार रुपये वसुल करण्यात आले. तर धनादेश प्रकरणांपैकी 96 प्रकरणे निकाली काढण्यात आली. कामगार न्यायालयातील 2 प्रकरणे निकाली काढण्यात आली. 
चंद्रपूर जिल्हयातील सर्व न्यायालयात लोक अदालत यशस्वी होण्यासाठी सर्व न्यायाधीश, सर्व वकील, सर्व न्यायालयीन कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांनी सहकार्य केले, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी यांनी दिली.

Comments