वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

EVM गैरप्रयोगाचा आरोप: वरोरा-भद्रावतीतील निवडणुकीच्या चौकशीसाठी मुकेश जीवतोडेसह कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा

EVM गैरप्रयोगाचा आरोप: वरोरा-भद्रावतीतील निवडणुकीच्या चौकशीसाठी मुकेश जीवतोडेसह कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा

फक्त बातमी 

वरोरा: 75 वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत भाजप उमेदवाराच्या विजयावर संशय व्यक्त करत अपक्ष उमेदवार मुकेश जिवतोडे आणि त्यांच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करत त्यांनी EVM मशीनमध्ये छेडछाड झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.

कार्यकर्त्यांनी सांगितले की, ज्या ठिकाणी भाजपचे पूर्वी कोणतेही वर्चस्व नव्हते, त्या ठिकाणी पक्षाचा विजय होणे संशयास्पद आहे. यामुळे EVM मशीनचा गैरप्रयोग झाला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संबंधित निवडणुकीची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.

तसेच, भविष्यातील सर्व निवडणुका बॅलेट पेपर पद्धतीने घेण्यात याव्यात, जेणेकरून निवडणूक प्रक्रिया पारदर्शक होईल आणि जनतेचा लोकशाहीवरचा विश्वास कायम राहील, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

निवेदन देताना कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत निष्पक्ष निवडणुकीची हमी देण्यासाठी ठोस पावले उचलली जात नाहीत, तोपर्यंत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती, आणि त्यांनी निष्पक्ष चौकशीची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली.

Comments