वरोराच्या दूषित पाणीप्रश्नी आमदार करण देवतळे यांची सभागृहात लक्षवेधी; दोषी कंपनी ब्लॅकलिस्ट-विदर्भ मल्टीसर्विसेस कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती?

वरोराच्या दूषित पाणीप्रश्नी आमदार करण देवतळे यांची सभागृहात लक्षवेधी; दोषी कंपनी ब्लॅकलिस्ट- विदर्भ मल्टीसर्विसेस कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती? मुंबई/वरोरा: विधानसभेत आज वरोरा शहरातील कालबाह्य पाणीपुरवठा योजना व दूषित पाणी पुरवठ्याच्या गंभीर प्रश्नी भाजप आमदार करण संजय देवतळे यांनी लक्षवेधी सूचना मांडून शासनाचे लक्ष वेधले. यावेळी त्यांनी दूषित पाण्यामुळे झालेल्या बालमृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या विदर्भ मल्टीसर्विसेस कंपनीवर कारवाईची मागणी केली. आमदार देवतळे यांनी सभागृहात नमूद केले की, वरोरा शहरात १९७२ पासून सुरू असलेली पाणीपुरवठा योजना पूर्णपणे कालबाह्य झाली आहे. अनेक ठिकाणी पाईपलाईन मोडकळीस आल्याने वारंवार लिकेज होत असून सांडपाण्याचा पाणीपुरवठा लाईनमध्ये शिरकाव होत आहे. यामुळे नागरिकांना दूषित पाणी मिळत असल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. यासंदर्भात जुलै २०२४ मध्ये दूषित पाण्यामुळे चार वर्षीय पूर्वेश वांढरे (रा. मालवीय वार्ड, वरोरा) याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची वेदनादायक घटना घडल...

ऊस शेतकरी या चिन्हाला जनता मतदान करणार.

ऊस शेतकरी या चिन्हाला जनता मतदान करणार.

वरोरा 
चेतन लुतडे 

वरोरा विधानसभेत अपक्ष उमेदवार राष्ट्रीय पक्षावर जोरदार टीका करीत असून सर्वसामान्याचे राजकारण राहिली नाही अशी परखड भूमिका डॉक्टर चेतन खूटेमाटे  यांनी व्यक्त केली आहे. 

 राजकारणात घराणेशाहीला उधान आले असून आमदारकी, खासदारकी व महत्त्वाची पदे ही आपल्या घरातच कशी राहील यासाठीच प्रस्थापित राजकारणी प्रयत्नात आहे.या निवडणुकीतही प्रमुख पक्षांनी घराणेशाहीतूनच उमेदवार दिले आहे. हा इतर कार्यकर्त्यांवर अन्याय आहे. यामुळे सत्तेचे विकेंद्रीकरण न होता ते केंद्रित होत आहे. त्यामुळे या निवडणुकीत घराणेशाहीला हद्दपार करून नागरीकांच्या समस्यांची जाण असलेल्या  प्रामाणिक उमेदवारालाच आपले मत द्या असे आवाहन अपक्ष उमेदवार डॉ. चेतन खुटेमाटे यांनी मतदारांना केले आहे 

मतदार हे सुज्ञ आहेत कोणत्याही प्रलोभनाला बळी पडणार नाहीत. जनतेला तात्पुरते पैसे पाहिजे की पाच वर्षाचा विकास हा प्रश्न उभा राहिला असून राजकारणांनी मतदारांना गृहीत धरणे सोडून द्यावे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

Comments