वरोरा येथे भव्य श्याम भजन संध्या संपन्न; भक्तीच्या रंगात रंगले भक्तगण. श्री खाटूश्याम बाबा यांचे मंदिर वरोरा शहर लवकरच उभारणार

वरोरा येथे भव्य श्याम भजन संध्या संपन्न; भक्तीच्या रंगात रंगले भक्तगण.  श्री खाटूश्याम बाबा यांचे मंदिर वरोरा शहर लवकरच उभारणार वरोरा/ चेतन लूतडे/२९/३/२६  श्री खाटूश्याम बाबांच्या असीम कृपेने वरोरा नगरीत ‘भव्य श्याम भजन संध्या’ अत्यंत उत्साहात व भव्य दिव्य रोषणाईत, मंगलमय वातावरणात द्वारकाधीश लाॅन  येथे संपन्न झाली. या वेळी श्री खाटू श्यामजींच्या भक्तीने संपूर्ण परिसर भारावून गेला होता. प्रसिद्ध भजन गायक श्री. सागरजी व्यास (हैदराबाद) व निधी मंत्री नागपूर यांच्या सुमधुर आवाजातील भजनांनी भाविकांच्या मनाला एक वेगळीच शांती व प्रसन्नता दिली. फुलांची वर्षा, अखंड ज्योत, अत्तराचा वर्षाव आणि बाबांचा अलौकिक दरबार पाहून भक्तीचा महासागर लोटल्याचा अनुभव वरोरा शहरातील भाविकांना आला. या मंगलमय सोहळ्याला उपस्थित राहण्याचे भाग्य वरोरा वाशीयांना लाभले, त्याबद्दल श्यामबाबांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. व वरोरा शहरात बाबाचे मंदिर बनविण्याचा मानस डॉक्टर सागर वजे यांनी व्यक्त केला आहे. "करने वाला श्माम करन वाला श्माम" कार्यक्रमांमध्ये ...

महापरिनिर्वाण दिनासाठी जिल्ह्यातून विशेष रेल्वे ची मागणी - खा. प्रतिभा धानोरकर


महापरिनिर्वाण दिनासाठी जिल्ह्यातून विशेष रेल्वे ची मागणी - खा. प्रतिभा धानोरकर

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी आंबेडकरी अनुयायी 06 डिसेंबर रोजी मुंबई ला जाणार आहेत. त्याकरीता बल्लारपूर येथून मुंबई करीता अप-डाऊन विशेष रेल्वे सेवा देण्याची मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी चेअरमन रेल्वे बोर्ड व मध्य रेल्वेच्या मुख्य महाप्रबंधक यांना पत्राद्वारे केली आहे.

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 06 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन असल्याने  जिल्ह्यातून लाखो अनुयायी अभिवादनाकरीता मुंबई ला जाणार आहेत. परंतु,  जिल्ह्यातून मुंबई ला जाण्याकरीता नियमित रेल्वे सेवा नसल्याने अनुयायांची अडचण निर्माण होत आहे. याकरीता खासदार प्रतिभा धानोरकर यांनी  मध्य रेल्वेचे मुख्य महाप्रबंधक तसेच चेअरमन रेल्वे बोर्ड यांना पत्र लिहून दि. 04 डिसेंबर ला मुंबई जाणारी व 07 डिसेंबर ला बल्लारपूर ला येणारी विशेष रेल्वे सेवा देण्याची मागणी करण्यात आली आहे. चंद्रपूर  जिल्ह्यात बौध्द अनुयायांची संख्या मोठी असल्याने महामानवास अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायांना जाता येणार आहे. वरील मागणी ची तात्काळ दखल घेण्याची विनंती देखील खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पत्राद्वारे केली आहे.

Comments