खाकीची मान उंचावली! पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा भव्य सत्कार: पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला

खाकीची मान उंचावली! पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा भव्य सत्कार  पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला बातमी: वरोरा 16/4/26 वरोरा : १४ एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीच्या उत्सवी वातावरणात आंबेडकर चौक, वरोरा येथे अचानक आग लागल्याची घटना घडली. या गंभीर प्रसंगी सहाय्यक  पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांनी विलक्षण तत्परता आणि धाडस दाखवत स्वतः पुढाकार घेत, आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. त्यांच्या या वेगवान व धैर्यशील कृतीमुळे मोठा अनर्थ टळला. या पराक्रमाची दखल घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, वरोरा तर्फे पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना पुष्पगुच्छ, शाल व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. शरद भस्मे यांच्या कार्यामुळे ‘खाकी’ वर्दीवरील विश्वास अधिक दृढ झाला असून, त्यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. संकटसमयी दाखवलेली त्यांची जबाबदारी, तत्परता आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी ही इतरांसाठी प्रेरणादायी ठरते. “संकटाच्या वेळी धावून येणारी खाकीच खरी जनतेची ताकद आहे,” याचे उत्तम उदाहरण म्हणजे शरद भस्मे य...

महापरिनिर्वाण दिनासाठी जिल्ह्यातून विशेष रेल्वे ची मागणी - खा. प्रतिभा धानोरकर


महापरिनिर्वाण दिनासाठी जिल्ह्यातून विशेष रेल्वे ची मागणी - खा. प्रतिभा धानोरकर

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी आंबेडकरी अनुयायी 06 डिसेंबर रोजी मुंबई ला जाणार आहेत. त्याकरीता बल्लारपूर येथून मुंबई करीता अप-डाऊन विशेष रेल्वे सेवा देण्याची मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी चेअरमन रेल्वे बोर्ड व मध्य रेल्वेच्या मुख्य महाप्रबंधक यांना पत्राद्वारे केली आहे.

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 06 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन असल्याने  जिल्ह्यातून लाखो अनुयायी अभिवादनाकरीता मुंबई ला जाणार आहेत. परंतु,  जिल्ह्यातून मुंबई ला जाण्याकरीता नियमित रेल्वे सेवा नसल्याने अनुयायांची अडचण निर्माण होत आहे. याकरीता खासदार प्रतिभा धानोरकर यांनी  मध्य रेल्वेचे मुख्य महाप्रबंधक तसेच चेअरमन रेल्वे बोर्ड यांना पत्र लिहून दि. 04 डिसेंबर ला मुंबई जाणारी व 07 डिसेंबर ला बल्लारपूर ला येणारी विशेष रेल्वे सेवा देण्याची मागणी करण्यात आली आहे. चंद्रपूर  जिल्ह्यात बौध्द अनुयायांची संख्या मोठी असल्याने महामानवास अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायांना जाता येणार आहे. वरील मागणी ची तात्काळ दखल घेण्याची विनंती देखील खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पत्राद्वारे केली आहे.

Comments