वरोऱ्यात पुस्तक विक्रीसाठी ‘सेटिंग’ ? विद्यार्थ्यांना शाळेचा नवीन सेट घेणे बंधनकारक.शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल .

वरोऱ्यात पुस्तक विक्रीसाठी ‘सेटिंग’ ? विद्यार्थ्यांना शाळेचा नवीन सेट घेणे बंधनकारक. शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल . वरोरा, ता. 30 (प्रतिनिधी): वरोरा येथील सेंट ॲनिस हायस्कूल प्रशासनावर पुस्तक विक्रीत नफेखोरीचा गंभीर आरोप होत असून, स्थानिक पुस्तक विक्रेत्यांना डावलून बाहेरील विक्रेत्याला प्राधान्य दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या विरोधात शहरातील स्थानिक पुस्तक विक्रेत्यांनी गुरुवार, दि. ३० एप्रिल रोजी एकत्र येत गट शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. माहितीनुसार, सेंट ॲनिस शाळा प्रशासन यापूर्वीही विविध कारणांमुळे चर्चेत राहिले आहे. काही दिवसांपूर्वी शाळेमधूनच पाठ्यपुस्तके व शैक्षणिक साहित्य विक्री होत असल्याचा आरोप झाला होता. यानंतरही प्रशासनाने अप्रत्यक्ष मार्गाने पुस्तक विक्री सुरूच ठेवल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाल्यानंतर शाळेकडून पालकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर “पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत” असा संदेश पाठविण्यात आला. मात्र प्रत्यक्षात शहरातील कोणत्याही पुस्तक विक्रेत्याकडे संबंधित या...

*पोस्ट कार्यालयामधून लाडकी बहीण योजनेच्या पैशांचे कमी वाटप :लाभार्थी महिला त्रस्त* *एका दिवसात ५० हजाराच्याच वाटपाचे अधिकार : पोस्ट कार्यालय*

*पोस्ट कार्यालयामधून लाडकी बहीण योजनेच्या पैशांचे कमी वाटप :लाभार्थी महिला त्रस्त*

 *एका दिवसात ५० हजाराच्याच वाटपाचे अधिकार : पोस्ट कार्यालय*

अतुल कोल्हे भद्रावती : 

              पोस्ट कार्यालयामधून शासनाच्या विविध योजनांचे पैसे लाभार्थ्यांनी मागणी केलेल्या पैशांपेक्षा कमी देत असल्याने लाभार्थी त्रस्त आहेत. विशेषत: लाडकी बहिण योजनेत महिला लाभार्थी आहेत. त्यामुळे त्याची झळ महिलांना बसत आहे. 
   अलीकडे शासनाने लाडकी बहीण योजना आणली. प्रत्येक पात्र महिलेला महिना १५०० रुपये देण्यात येत आहे. शासनाच्या सांगण्यानुसार अनेक महिलांनी पोस्ट कार्यालयात आपले खाते काढले. लाभार्थी महिला आपल्या खात्यात आलेले पैसे काढण्याकरीता पोस्ट कार्यालयात गेले असता त्यांनी मागणी केलेले पूर्ण पैसे न देता कमी पैसे दिल्या जात आहे. या पोस्ट ऑफिस मध्ये ग्रामीण भागातील अनेक महिलांनी खाते काढले. त्या सकाळी ९ वाजताच रांगा लावून असतात. पोस्ट कार्यालयास दिवसाला फक्त ५० हजार रुपयांच्या वाटपाचे अधिकार असल्याने अनेक महिलांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. असल्या प्रकाराने लाभार्थी महीला त्रस्त झाल्या आहेत.
    याबाबत पोस्ट खात्याचे प्रभारी अधिकारी गणेश पुलगमवार यांना विचारणा केली असता आम्हाला दिवसाला फक्त ५० हजार रुपयांच्या वाटपाचे अधिकार आहे. त्यामुळे प्रत्येकाला थोडी थोडी रक्कम दिल्या जाते. या व्यतिरिक्त पिक विमा योजना आणि इतर योजनांच्या पैशाचे वाटप याच रकमेतून करावे लागत आहे. वाटपाच्या वाढीव रकमेची आम्ही वरिष्ठअधिकारी कडे मागणी केलेली असल्याचे त्यांनी सांगितले.

Comments