वाढत्या उन्हामुळे शाळा - महाविद्यालये सकाळच्या सत्रात 11 वाजेपर्यंतच ठेवाØ जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी निर्गमित केले आदेश

वाढत्या उन्हामुळे शाळा - महाविद्यालये सकाळच्या सत्रात 11 वाजेपर्यंतच ठेवा  जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी निर्गमित केले आदेश चंद्रपूर, दि. 19 : जिल्ह्यात सध्या वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 11 मार्च 2026 रोजी आयोजित बैठकीत शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद यांना शाळा सकाळ सत्रात घेण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाचा तीव्र तडाखा जाणवत असून तापमान 44 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः उष्माघात (सन स्ट्रोक) व इतर उष्णतेशी संबंधित आजारांचा धोका लक्षात घेता विद्यार्थ्यांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. दुपारच्या कडक उन्हात शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी जाताना होणारा त्रास टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या (शासकीय, अनुदानित व खासगी) शाळा व महाविद्यालयांच्या वेळांमध्ये तात्पुरता बदल कर...

गुरुदेव भक्तांचा जागर मेळावा.... _चला बदल घडवूया चा आध्यात्मिक उपक्रम_

गुरुदेव भक्तांचा जागर मेळावा....

 _चला बदल घडवूया चा आध्यात्मिक उपक्रम_ 

फक्त बातमी 
चेतन लुतडे 
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या स्मृती पर मौन श्रद्धांजली निमित्य श्री. गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने भव्य गुरुदेव भक्त व महिला जागर मेळाव्याचे आयोजन वरोरा येथील शगुन मंगल कार्यालयात रविवार दिनांक ६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता करण्यात आलेले आहे.

वरोरा भद्रावती क्षेत्रातील गुरुदेव भक्त व महिला यांच्या करिता डॉ. चेतन खुटेमाटे यांच्या संकल्पनेतून *चला बदल घडवूया* उपक्रमांतर्गत भव्य जागर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसंगी अमरावती गुरुकुंज मोझरी येथील प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प.  काळे महाराज यांचे मार्गदर्शन गुरुदेव भक्तांना लाभणार आहे .तसेच विवेकवादी विचारवंत तथा प्रबोधनकार श्री. दिलीप सोळंके हे 'महिला सक्षमीकरणात विवेकाचा वापर' या विषयावर उपस्थित बंधू भगिनींसोबत संवाद साधणार आहेत . तरी या अध्यात्मिक  पर्वणी चा लाभ वरोरा -भद्रावती क्षेत्रातील संपूर्ण गुरुदेव भक्त तथा महिला भगिनींनी घ्यावा असे आवाहन श्री.गुरुदेव सेवा मंडळ वरोरा ,भद्रावती यांच्यातर्फे करण्यात आलेले आहे.

Comments