प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

भद्रावती येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या*

*भद्रावती येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या*

अतुल कोल्हे भद्रावती :-
             एका 42 वर्षीय युवकाने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक तीन रोज गुरुवारला रात्रो  साडेनऊ वाजता शहरातील भोजवार्ड  येथे घडली. आशिष विठ्ठल झुरमुरे, वय 42 वर्षे, राहणार भोजवार्ड,  भद्रावती असे मृतक युवकाचे नाव आहे.सदर युवक हा आपल्या आजी सोबत भोजवार्ड  येथे राहत होता. घटनेच्या दिवशी तो बेडरूम मध्ये गेला. बराच वेळ बाहेर आला नसल्याने आजीने दार ढकलुन पाहिले असता तो पंख्याला दोरीच्या साह्याने गळफास घेतल्याचा आढळून आला. सदर घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.


Comments