मध्यमवर्गीय गृहकर्जदारांना २.५० लाखांची सबसिडी तात्काळ द्या; खासदार प्रतिभाताई धानोरकर यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी

: मध्यमवर्गीय गृहकर्जदारांना २.५० लाखांची सबसिडी तात्काळ द्या; खासदार प्रतिभाताई धानोरकर यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी चंद्रपूर : प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत मध्यमवर्गीय (एमआयजी) गृहकर्जदारांना देय असलेली ₹ २.५० लाखांची ‘क्रेडिट लिंक्ड सबसिडी’ तात्काळ वितरित करण्याची मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्र सरकारकडे जोरदारपणे केली आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय आवासन व शहरी कार्य मंत्री मनोहर लाल यांना एक पत्र पाठवून चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडो पात्र लाभार्थ्यांची प्रलंबित सबसिडीबाबत लक्ष वेधले आहे. खासदार धानोरकर यांनी पत्रात नमूद केले आहे की, २०१७ ते २०२१ या कालावधीत बँकांकडून गृहकर्ज घेतलेल्या अनेक पात्र मध्यमवर्गीय लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत अपेक्षित सबसिडी मिळालेली नाही. ‘ग्राहक पंचायत महाराष्ट्र’ या संघटनेने दिलेल्या निवेदनानुसार, अनेक वर्षे उलटूनही ही रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा न झाल्याने कर्जदारांवर २.५० लाख रुपयांच्या अतिरिक्त मुद्दलाचा तसेच त्यावर वाढत असलेल्या व्याजाचा मोठा आर्थिक बोजा पडत आहे. यामुळे सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबांचे आर्...

नगर परिषद भद्रावती तर्फे भव्य चित्रकला स्पर्धा संपन्न**सुंदर भद्रावती स्वच्छ भद्रावती शहर करण्यास सहकार्य करावे : मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी यांचे आवाहन*

*नगर परिषद भद्रावती तर्फे भव्य चित्रकला स्पर्धा संपन्न*

*सुंदर भद्रावती स्वच्छ भद्रावती शहर करण्यास सहकार्य करावे : मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी यांचे आवाहन*

अतुल कोल्हे भद्रावती : 
               राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून 'स्वच्छता ही सेवा २०२४' या  अभियान अंतर्गत स्थानिक नगरपालिका अंतर्गत दि.१४ सप्टेंबर ते १ ऑक्टोंबर पर्यंत पंधरवाडा राबविण्यात आला.आणि
२ ऑक्टोंबर हा दिवस स्वच्छ भारत म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी स्वच्छ भद्रावती सुंदर भद्रावती करण्याकरिता नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन नगरपालिकेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी यांनी केले.
   दरम्यान या पंधरवाड्यात स्वच्छ भारत, स्वच्छ संस्कार स्वच्छता हे अभियान राबविण्यात आले. नगर परिषदेने शैक्षणिक
संस्था, शाळा, महाविदयालयामध्ये स्वच्छ भारत अभियानाची जागरूकता पसरविण्यासाठी भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन तालुका क्रिडा संकुल येथे करण्यात आले. या स्पर्धेत एकुण १९ शाळांनी सहभाग नोंदविला असुन वर्ग ८ वी ते १० वी अ गट, वर्ग ५ वी ते ७ वी ब गट, वर्ग १ ला ते ४ था क गट या तिन गट निहाय चित्रकला स्पर्धेत एकूण ४०० विदयार्थ्यांनी भाग घेतला.
या स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी नगरपालिकेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ.विशाखा शेळकी, ठाणेदार  बिपीन इंगळे, माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, यांचे उपस्थितीत महात्मा गांधी व लाल बहादुर शास्वी यांचे जयंतीचा कार्यक्रम घेवुन चित्रकला स्पर्धेला सुरूवात झाली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी विजयकुमार जांभुळकर यांनी केले.
या चित्रकला स्पर्धेला यशस्वी करण्याकरीता नगर परिषदेच्या सर्व अधिकारी कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

Comments