वाढत्या उन्हामुळे शाळा - महाविद्यालये सकाळच्या सत्रात 11 वाजेपर्यंतच ठेवाØ जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी निर्गमित केले आदेश

वाढत्या उन्हामुळे शाळा - महाविद्यालये सकाळच्या सत्रात 11 वाजेपर्यंतच ठेवा  जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी निर्गमित केले आदेश चंद्रपूर, दि. 19 : जिल्ह्यात सध्या वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 11 मार्च 2026 रोजी आयोजित बैठकीत शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद यांना शाळा सकाळ सत्रात घेण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाचा तीव्र तडाखा जाणवत असून तापमान 44 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः उष्माघात (सन स्ट्रोक) व इतर उष्णतेशी संबंधित आजारांचा धोका लक्षात घेता विद्यार्थ्यांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. दुपारच्या कडक उन्हात शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी जाताना होणारा त्रास टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या (शासकीय, अनुदानित व खासगी) शाळा व महाविद्यालयांच्या वेळांमध्ये तात्पुरता बदल कर...

आयुध निर्माणी चांदा येथे दारूगोळा प्रदर्शनीचे महाप्रबंधक विजयकुमार यांचे हस्ते उद्घाटन**प्रदर्शनीचा लाभ परिसरातील विद्यार्थी व नागरिकांनी घेण्याचे आवाहन*

*आयुध निर्माणी चांदा येथे दारूगोळा प्रदर्शनीचे महाप्रबंधक विजयकुमार यांचे हस्ते उद्घाटन*

*प्रदर्शनीचा लाभ परिसरातील विद्यार्थी व नागरिकांनी घेण्याचे आवाहन*

अतुल कोल्हे भद्रावती :-
                    आयुध निर्माणी चांदा वसाहतीतील सार्वजनिक सभागृहात दिनांक 1 ऑक्टोबर रोज मंगळवारला दुपारी तीन वाजता दोन दिवसीय दारूगोळा प्रदर्शनीचे उद्घाटन निर्माणचे महाप्रबंधक विजयकुमार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी निर्माणीचे अन्य अधिकारी उपस्थित होते. सदर प्रदर्शनी 2 ऑक्टोबरला सकाळी दहा वाजता पासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सर्वसामान्य नागरिक व विद्यार्थ्यांसाठी खुली राहणार आहे. सदर प्रदर्शनीत आयुध निर्माणी  चांदा येथे उत्पादित करण्यात येत असलेल्या दारूगोळा प्रतिकृती प्रदर्शनार्थ ठेवण्यात आल्या  आहेत. यात पिनाका मिसाईल, विविध प्रकारचे बॉम्ब, राकेट आदींचा समावेश आहे. सदर प्रदर्शनीचा लाभ परिसरातील विद्यार्थी व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन महाप्रबंधक विजयकुमार यांनी यावेळी केले आहे.

Comments