वरोरा येथे खूनाचा प्रयत्न: फोन का उचलत नाही म्हणून विवाहितेवर चाकूहल्ला

वरोरा येथे खूनाचा प्रयत्न: फोन का उचलत नाही म्हणून विवाहितेवर चाकूहल्ला वरोरा, ता. ४ मार्च : "तू माझ्याशी बोलत का नाही? माझा फोन का उचलत नाही?" असे म्हणत एका तरुणाने एका विवाहित महिलेवर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी (दि. ३ मार्च) सायंकाळी उघडकीस आली. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरातील यात्रा वार्ड प्रभाग सात मधील परिसरात ही घटना घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, ४० वर्षीय राखी अजय लिहितकर या सहा वर्षांपूर्वी भद्रावती येथील एका पेट्रोल पंपावर कार्यरत होत्या. तेथेच त्यांची ओळख विक्की बावणे याच्याशी झाली होती. तेव्हापासून विक्की हा राखी यांना भेटण्यासाठी येत असे आणि वारंवार फोन करून त्रास देत असे. या त्रासाला कंटाळून राखी यांनी याबाबत आपले पती अजय लिहितकर यांना माहिती दिली. अजय यांनी विक्कीला ताडून पुन्हा फोन न करण्याची धमकी दिली. मात्र, धुळवंदनाच्या दिवशी विक्की हा थेट राखी यांच्या घरी पोहोचला. राखी यांनी दरवाजा उघडताच, विक्कीने "तू माझा फोन का उचलत नाही? तुझा मर्डर करून टाकीन," अशी भीषण धमकी देत कंबरेतून चाकू काढून...

चंद्रपूर जिल्ह्यात पहिल्या दिवशी एकही नामांकन दाखल नाही* *सहा विधानसभा मतदारसंघात इच्छुकांकडून 216 अर्जांची उचल*

*चंद्रपूर जिल्ह्यात पहिल्या दिवशी एकही नामांकन दाखल नाही* 

*सहा विधानसभा मतदारसंघात इच्छुकांकडून 216 अर्जांची उचल* 

चंद्रपूर, दि. 22 :  महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक  निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नामांकन दाखल करावयाच्या पहिल्या दिवशी आज (दि. 22) चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात एकही नामांकन दाखल करण्यात आलेले नाही. तर इच्छुकांकडून 216 अर्जांची उचल करण्यात आली. 

विधानसभा निवडणुकीची अधिसूचना 22 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर नामनिर्देशन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. नामांकन दाखल करावयाच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील 70-राजुरा विधानसभा मतदारसंघात 44 अर्ज, 71-चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात 31 अर्ज, 72-बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात 56 अर्ज, 73-ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात 34 अर्ज, 74-चिमूर मतदारसंघात 24 अर्ज आणि 75-वरोरा विधानसभा मतदारसंघात 27 अर्ज असे एकुण सहा विधानसभा मतदारसंघात इच्छुकांकडून 216 अर्जांची उचल करण्यात आली आहे. 
   महाराष्ट्रातील विधानसभेच्या एकूण 288 जागांसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. 22 ऑक्टोंबर रोजी निवडणूक अधिसूचना जारी झाल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 29 ऑक्टोंबर असून, 30 ऑक्टोबरला अर्जांची छाननी होणार आहे. अर्ज माघारी घेण्याची मुदत 4 नोव्हेंबर पर्यंत आहे.
000000

Comments