वरोरा येथे खूनाचा प्रयत्न: फोन का उचलत नाही म्हणून विवाहितेवर चाकूहल्ला

वरोरा येथे खूनाचा प्रयत्न: फोन का उचलत नाही म्हणून विवाहितेवर चाकूहल्ला वरोरा, ता. ४ मार्च : "तू माझ्याशी बोलत का नाही? माझा फोन का उचलत नाही?" असे म्हणत एका तरुणाने एका विवाहित महिलेवर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी (दि. ३ मार्च) सायंकाळी उघडकीस आली. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरातील यात्रा वार्ड प्रभाग सात मधील परिसरात ही घटना घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, ४० वर्षीय राखी अजय लिहितकर या सहा वर्षांपूर्वी भद्रावती येथील एका पेट्रोल पंपावर कार्यरत होत्या. तेथेच त्यांची ओळख विक्की बावणे याच्याशी झाली होती. तेव्हापासून विक्की हा राखी यांना भेटण्यासाठी येत असे आणि वारंवार फोन करून त्रास देत असे. या त्रासाला कंटाळून राखी यांनी याबाबत आपले पती अजय लिहितकर यांना माहिती दिली. अजय यांनी विक्कीला ताडून पुन्हा फोन न करण्याची धमकी दिली. मात्र, धुळवंदनाच्या दिवशी विक्की हा थेट राखी यांच्या घरी पोहोचला. राखी यांनी दरवाजा उघडताच, विक्कीने "तू माझा फोन का उचलत नाही? तुझा मर्डर करून टाकीन," अशी भीषण धमकी देत कंबरेतून चाकू काढून...

प्रकल्पग्रस्तांसाठी विविध समस्या बाबत शेख जेरूद्दीन छोटूभाऊ यांचे अभिनव आंदोलन

प्रकल्पग्रस्तांसाठी विविध समस्या बाबत शेख जेरूद्दीन छोटूभाऊ यांचे अभिनव आंदोलन 

वरोरा 
चेतन लुतडे 

वरोरा तालुका व शहरातील विविध समस्यांचे निराकरण आणि न्याय मिळवण्यासाठी शेख जैरुद्दीन (छोटू भाई) यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालय, वरोरा येथे आयोजित करण्यात आला. 

वरोरा तालुक्यातील विविध समस्या संदर्भात व प्रकल्पग्रस्त रानतळोदी, पळसगाव, गावातील समस्या बाबत छोटू भाऊ शेख यांच्या नेतृत्वात बैलबंडी मोर्चा वरोरा येथील उपविभागीय पोलीस कार्यालय नेण्यात आला. मागील बऱ्याच वर्षापासून प्रकल्पग्रस्तांच्या समस्या प्रलंबित आहे. या गावातील बहुतांश नागरिक आदिवासी समाजाची असून प्राथमिक गरजा सुद्धा पूर्ण झालेले नाहीत. गावातील रोड ,नाली, पिण्याचे शुद्ध पाणी, शाळा, दवाखाना, अंगणवाडी केंद्र अशा बऱ्याच सुविधांपासून हे गाव वंचित आहे. थातूरमातूर इमारती उभ्या करून प्रोजेक्ट पूर्ण झाल्याचे सांगण्यात येते. मात्र या ठिकाणी अजूनही बऱ्याच समस्यांना गावकरी तोड देत आहे. 
नवीन उपविभागीय अधिकारी तथा ॲडिशनल कलेक्टर म्हणून नियुक्ती झालेले डी झेनित चंद्रा सध्या कार्यरत असून प्रकल्पग्रस्त शेतकरी न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करत आहे. 
डोंगरगाव ,नागरी येथील अवैध उत्खनन , वाढत असलेले विद्युत युनिट दर, वन हक्क प्रकरणे, अतिक्रमित जागेची नियमित पट्टे देण्याबाबत, कोळसा खदान नितीन ब्लास्टिंग , सरसकट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई. 
अशा अनेक विविध मागण्या घेऊन छोटू भाऊ शेख यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. 
वरील मागणीवर उपविभागीय अधिकारी संबंधित कार्यालयाला विचारपूस करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मत व्यक्त केले.
या आंदोलनात छोटू भाऊ शेख यांच्यासोबत प्रकल्पग्रस्त व त्यांचे सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Comments