वाढत्या उन्हामुळे शाळा - महाविद्यालये सकाळच्या सत्रात 11 वाजेपर्यंतच ठेवाØ जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी निर्गमित केले आदेश

वाढत्या उन्हामुळे शाळा - महाविद्यालये सकाळच्या सत्रात 11 वाजेपर्यंतच ठेवा  जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी निर्गमित केले आदेश चंद्रपूर, दि. 19 : जिल्ह्यात सध्या वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 11 मार्च 2026 रोजी आयोजित बैठकीत शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद यांना शाळा सकाळ सत्रात घेण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाचा तीव्र तडाखा जाणवत असून तापमान 44 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः उष्माघात (सन स्ट्रोक) व इतर उष्णतेशी संबंधित आजारांचा धोका लक्षात घेता विद्यार्थ्यांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. दुपारच्या कडक उन्हात शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी जाताना होणारा त्रास टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या (शासकीय, अनुदानित व खासगी) शाळा व महाविद्यालयांच्या वेळांमध्ये तात्पुरता बदल कर...

तंमुसच्या पुढाकाराने चंदनखेडा येथील प्रेमी युगल विवाहबद्ध : आदर्श गावात विवाह**दोघांनीही सुखाने संसार करण्याची घेतली शपथ*

*तंमुसच्या पुढाकाराने चंदनखेडा येथील प्रेमी युगल विवाहबद्ध : आदर्श गावात  विवाह*

*दोघांनीही सुखाने संसार करण्याची घेतली शपथ*

अतुल कोल्हे भद्रावती :-
                तालुक्यातील चंदनखेडा येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीने चंदनखेडा  येथील सुरेश काशिनाथ कोडापे (30) व भाग्यश्री ईश्वर कांबडे(24) यांनी चंदनखेडा येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीकडे अर्ज सादर करुन लग्न लावून देण्याची विनंती केली होती.
दिनांक  05 सप्टेंबर 2024ला. महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष मनोहर शालिक हनवते  यांनी दोघांचीही कागदपत्रे तपासून व या विवाह ला आवर्जुन मुलांचे आई - भाऊ व इतर नातेवाईकांना तंटामुक्त समिती मार्फत बोलविण्यात आले होते व ते स्वतः हजर राहून वरवधुला आशिर्वाद देऊन त्यांनांच आनंद दृघुनी करण्यात तंटामुक्त समितीला यश आलं व समोरिल जिवन सुरळीत चालत रहावं अशा शुभेच्छा मुलाच्या आई वडिल भाऊ व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या कडुन देण्यात आल्या. व   त्यांचा विवाह 05 सप्टेंबर 2024 गुरुवार ला.सायंकाळी 8:15 ला.विवाह हनुमान मंदिर सीताबर्डी  देवस्थान चंदनखेडा येथे  गावातील पंचासमक्ष लावून दिला.
यावेळी,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोहर हनवते, पोलिस पाटील समिर पठाण, सरपंच नयन जांभुळे,  सिंगलदीप पेंदाम, रविंद्र मेश्राम,लोकेश कोकुडे, शाहरुख पठाण, विठ्ठल महागमकार,चंद्रभान बोढे,बंडूजी गोहणे,प्रकाश सोरते, बाळकृष्ण गोहणे संदीप मानकर, सागर मानकर, निसार का पठाण,अतुल घरत, , गणेश जिवतोडे,सुरज भोयर, गणपत घरत,, अक्षय मोहाळे, अंकुश चट्टे  तंटामुक्त समिती सदस्या छाया घुगरे, सुशिलाबाई हनवते,कासाबाई कांबळे,सोनाबाई खडसंग, ,दिवाकर गोहणे, दिनेश दोडके, देवानंद पांढरे, वृषभ दडमल,देवानंद दोडके,अमोल महागकार,आशिष हनवते व समस्त आदि गावातील उपस्थित होते.आई वडिल व तंटामुक्त समिती मार्फत यावेळी दोघांनीही ‌सुखदुखात  एकमेकांना साथ देण्याची  शपथ घेतली.

Comments