वरोरात भव्य ऑल इंडिया कॅरम स्पर्धेचे आयोजन, लाखो रुपयाचे बक्षिसे .

वरोरात भव्य ऑल इंडिया कॅरम स्पर्धेचे आयोजन, लाखो रुपयाचे बक्षिसे . वरोरा (जि. चंद्रपूर), दि. १२ मार्च: इंडिया कॅरम क्लब, वरोरा तर्फे येत्या २२, २३, २४ व २५ मार्च रोजी भव्य ऑल इंडिया कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सिद्धिविनायक सभागृह, पोलीस स्टेशन समोर, वरोरा (नागपूर-चंद्रपूर महामार्गालगत) येथे पार पडणार आहे. दरवर्षी ही स्पर्धा आयोजित केल्या जाते. स्पर्धेत सिंगल व डबल अशा दोन्ही गटांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. सिंगल गटात प्रथम क्रमांकास ३१,००१ रुपये, द्वितीय क्रमांकास १५,००१ रुपये , तृतीय क्रमांकास ७,००१ रुपये  देण्यात येतील. डबल गटात प्रथम क्रमांकास ४१,००१ रुपये (मा.सौ. अर्चना आशिषभाऊ ठाकरे, नगराध्यक्षा, स्व. बाबाजी खापने स्मृतीप्रित्यर्थ मा.श्री. जगदीश खापणे, मा.सौ. लिना संजय गयनेवार यांचेतर्फे), द्वितीय क्रमांकास २५,००१ रुपये (स्व. अभय मेश्राम स्मृतीप्रित्यर्थ मा.श्री. भारत नेरकर, मा.श्री. मनीष जेठानी, मा.श्री. कुणाल रुयारकर, मा.श्री. गजानन जीवतोडे, मा.श्री. भरत तेला यांचेतर्फे), तृतीय क्रमांकास ११,००१ रुपये (मा.श्री. कासिफ खान...

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या सिंदखेड राजा येथे सूरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला भद्रावती तालुक्यातील शेतकऱ्यांचा पाठिंबा**तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिले निवेदन*

*शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या सिंदखेड राजा येथे सूरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला भद्रावती तालुक्यातील शेतकऱ्यांचा पाठिंबा*

*तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिले निवेदन*

अतुल कोल्हे भद्रावती :-

          शेतकरी नेते रविकांत तुपकर हे जिजाऊ जन्मस्थळ सिंदखेडराजा येथे दि. ०६ सप्टेंबर पासून शेतक-यांच्या विविध प्रश्नांसाठी अन्नत्याग आंदोलनासाठी बसलेले आहेत. या अन्नत्याग आंदोलनाला पाठबळ देण्यासाठी आज (दि.६) ला भद्रावतीचे तहसीलदार खांडरे यांना निवेदन देण्यात आले.

सदर आंदोलनाच्या माध्यमातून कोणतीही अट न लावता सरसकट पिकविमा मिळाला पाहिजे, सोयाबिन, कापसाची दरवाढ झाली पाहिजे, अतिवृष्टीची मदत तात्काळ मिळाली पाहिजे, सरसकट कर्जमाफी झाली पाहीजे, आदी मागण्या पुढे करण्यात आल्या आहेत. या सर्व मागण्या व आंदोलनाला निवेदनातून पाठिंबा दिला आहे.

या मागण्या रास्त असून शेतक-यांच्या हिताच्या आहेत, तरी शासनाने वरील मागण्या मान्य करून शेतक-यांना न्याय दयावा, जर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या मागण्या मान्य न झाल्यास तिव्र आंदोलण करण्यात येईल व होणाऱ्या परिणामास शासन सर्वस्वी जबाबदार राहील, असे या निवेदनात म्हटले आहे.

निवेदन देताना कोंढा येथील युवा शेतकरीपुत्र बंटी थेरे, शैलेश गोंडे, प्रदिप डोंगे, विवेक मत्ते, नंदू गोंडे, कृष्णा थेरे, चंदन नागपुरे, रुपेश मत्त्ते, नरेन्द्र नागपुरे, विनोद चिकटे, योगेश दुधलकर, आदी उपस्थित होते.

Comments