वरोरा येथे भव्य श्याम भजन संध्या संपन्न; भक्तीच्या रंगात रंगले भक्तगण. श्री खाटूश्याम बाबा यांचे मंदिर वरोरा शहर लवकरच उभारणार

वरोरा येथे भव्य श्याम भजन संध्या संपन्न; भक्तीच्या रंगात रंगले भक्तगण.  श्री खाटूश्याम बाबा यांचे मंदिर वरोरा शहर लवकरच उभारणार वरोरा/ चेतन लूतडे/२९/३/२६  श्री खाटूश्याम बाबांच्या असीम कृपेने वरोरा नगरीत ‘भव्य श्याम भजन संध्या’ अत्यंत उत्साहात व भव्य दिव्य रोषणाईत, मंगलमय वातावरणात द्वारकाधीश लाॅन  येथे संपन्न झाली. या वेळी श्री खाटू श्यामजींच्या भक्तीने संपूर्ण परिसर भारावून गेला होता. प्रसिद्ध भजन गायक श्री. सागरजी व्यास (हैदराबाद) व निधी मंत्री नागपूर यांच्या सुमधुर आवाजातील भजनांनी भाविकांच्या मनाला एक वेगळीच शांती व प्रसन्नता दिली. फुलांची वर्षा, अखंड ज्योत, अत्तराचा वर्षाव आणि बाबांचा अलौकिक दरबार पाहून भक्तीचा महासागर लोटल्याचा अनुभव वरोरा शहरातील भाविकांना आला. या मंगलमय सोहळ्याला उपस्थित राहण्याचे भाग्य वरोरा वाशीयांना लाभले, त्याबद्दल श्यामबाबांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. व वरोरा शहरात बाबाचे मंदिर बनविण्याचा मानस डॉक्टर सागर वजे यांनी व्यक्त केला आहे. "करने वाला श्माम करन वाला श्माम" कार्यक्रमांमध्ये ...

राहुल गांधी यांच्या आरक्षणाच्या वक्तव्याचा शिवसेनेतर्फे जाहीर निषेध.

राहुल गांधी यांच्या आरक्षणाच्या वक्तव्याचा शिवसेनेतर्फे जाहीर निषेध.

वरोरा 
चेतन लुतडे 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात राहुल गांधी यांनी केलेल्या आरक्षणाच्या वक्तव्यावर महाराष्ट्रात निषेध नोंदवल्या जात आहे.

राहुल गांधी यांनी परदेश दौऱ्यावर असताना आरक्षणाबाबत वक्तव्य करत काँग्रेस सरकार आल्यास आरक्षण संपवून समानता आणण्याचा  विचार प्रकट केले होते. या वक्तव्याचा संपूर्ण भारतात निषेध व्यक्त होत असून याचे पडसाद महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे.

चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी काळ्या फिती लावून भव्य मोर्चा काढून भद्रावती विधानसभेत जाहीर निषेध नोंदवला आहे. काँग्रेसची सत्ता आल्यास आरक्षण संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या राहुल गांधींना आरक्षण हा संविधानात दिलेल्या मूलभूत अधिकाराचा भाग आहेत याचा विसर पडल्याची खंत व्यक्त करत. आरक्षण विरोधी काँग्रेसचा निषेध नोंदविला . बाबासाहेबांनी दिलेल्या लोकशाहीतील समानतेचा अधिकार म्हणून आरक्षण दिले होते. त्याच बाबासाहेबांना संसदेमध्ये येण्यापासून रोखण्याचा दोनदा काँग्रेसने  प्रयत्न केले. नेहरू पासून राहुल गांधीपर्यंतच्या काँग्रेस सरकारने आरक्षण संपवण्याचा विचार वारंवार केला आहेत. अशा विचारसरणीचा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. 
राहुल गांधींनी आपले वक्तव्य मागे घ्यावे, संविधान विरोधी काँग्रेसचा निषेध असो, आरक्षण बाबत वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींचा निषेध असो. अशा घोषणा देत वरोरा भद्रावती विधानसभेत  शिवसेना कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध नोंदवला.

यावेळी जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments