वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

*भद्रावती येथील विविध कार्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा*

*भद्रावती येथील विविध कार्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा*

अतुल कोल्हे भद्रावती :-

            भद्रावती तहसील कार्यालयासह शहरातील अन्य कार्यालयात देशाचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने विविध शहरातील विविध शासकीय कार्यालय तथा निमशासकीय कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. शहरातील तहसील कार्यालयात सकाळी नऊ वाजता प्रभारी तहसीलदार सुधीर खांडरे यांच्या हस्ते तिरंगा फडविण्यात आला. यावेळी तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. नगरपरिषद कार्यालयात सकाळी साडेसात वाजता नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉक्टर विशाखा शेळकी  यांच्या हस्ते तिरंग्याला मानवंदना देण्यात आली.सेवादल मैदानात 75 फूट उंचीच्या तिरंग्याचे नगरपरिषद कर्मचारी दुर्योधन गाऊत्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. भद्रावती पंचायत समिती कार्यालयात सकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर हुतात्मा स्मारक येथे नगर परिषदेचे उपमुख्य अधिकारी जगदीश गायकवाड यांच्या हस्ते तिरंगा फडकविण्यात आला. स्वातंत्र्यदिनानिमित्त शहरातील विविध शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Comments