प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

नागपूर - चंद्रपूर महामार्गावरील गड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात**आप चे विधानसभा प्रमुख सुरज शहा यांच्या प्रयत्नाला यश*

*नागपूर - चंद्रपूर महामार्गावरील गड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात*

*आप चे विधानसभा प्रमुख  सुरज शहा यांच्या प्रयत्नाला यश*

अतुल कोल्हे भद्रावती :-

          आम आदमी पार्टीच्या वतीने नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील गड्डे मुक्त करण्यासाठी नंदुरी टोल नाक्यावर काही दिवसा आधी दिलेल्या निवेदनाला प्रतिसाद मिळाला आहे. आपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी अनेकदा या विषयावर प्रशासनाकडे लक्ष वेधले होते. नागरिकांच्या तक्रारी आणि स्थानिकांच्या मागणीनुसार, अखेर प्रशासनाने या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. 
          नागपूर-चंद्रपूर महामार्ग हा वाहतुकीसाठी महत्त्वाचा मार्ग असून, रस्त्यावरील गड्ड्यांमुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अपघातांच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली होती. या परिस्थितीला बदलण्यासाठी आप ने नंदुरी टोल नाक्यावर निवेदन देऊन रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. 
        महामार्गावरील पडलेले खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात झाली असल्याने आता प्रवाशांना सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाचा अनुभव मिळेल अशी अपेक्षा आहे. आम आदमी पार्टी स्थानिक प्रशासनाकडून रस्त्याचे काम जलद गतीने आणि योग्य प्रकारे पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त करते. यापुढेही नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील गड्डेमुक्तीचे काम पूर्ण होईपर्यंत आम आदमी पार्टी स्थानिक पातळीवर लक्ष ठेवून राहील आणि आवश्यक त्या ठिकाणी आवाज उठवत राहील असे सांगण्यात आले आहे.

Comments