जाचक नियमांविरोधात वरोऱ्यात कृषी विक्री केंद्रांचा बेमुदत बंद; खरीप हंगामावर संकटाची छाया.

जाचक नियमांविरोधात वरोऱ्यात कृषी विक्री केंद्रांचा बेमुदत बंद; खरीप हंगामावर संकटाची छाया. स्थानिक अधिकाऱ्याकडून विनाकारण त्रास ? वरोरा, (प्रतिनिधी) : राज्य सरकारकडून कृषी निविष्ठा (खते, बियाणे, कीटकनाशके) विक्रेत्यांवर लादण्यात आलेल्या जाचक अटी व नियमांच्या निषेधार्थ राज्यभरातील कृषी आस्थापनांनी २७ एप्रिल २०२६ पासून बेमुदत संप पुकारला आहे. महाराष्ट्र फर्टिलायझर्स डीलर्स असोसिएशन च्या आवाहनाला प्रतिसाद देत वरोरा तालुका अॅग्रो डीलर्स असोसिएशननेही १०० टक्के बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे. खरीप हंगाम तोंडावर असताना घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कृषी विभागाच्या त्रासदायक कारवाया आणि कठोर नियमांमुळे विक्रेते मेटाकुटीस आले असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. रासायनिक खत कंपन्यांकडून केली जाणारी सक्तीची ‘लिंकिंग’ पद्धत, अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाण्यांची विक्री, तसेच ‘साथी’ मोबाइल अॅपद्वारेच बियाणे विक्रीची सक्ती याला तीव्र विरोध दर्शवण्यात आला आहे. याशिवाय, सीलबंद कीटकनाशके विकल्यानंतरही विक्रेत्यांवर होणारी दंडात्मक कारवाई आणि...

*_सामाजिक कार्यकर्ते काँग्रेस श्री सुरेंद्र जी देठे व समीर देठे यांनी पिढीत शेतकऱ्याला भेट देऊन केले स्वातवन.*

*_सामाजिक कार्यकर्ते काँग्रेस श्री सुरेंद्र जी देठे व  समीर देठे यांनी पिढीत शेतकऱ्याला भेट देऊन केले स्वातवन.* 

फक्त बातमी 
चेतन लुतडे वरोरा 

वरोरा तालुक्यातील पाचगाव येथील दोन शेतकऱ्यांच्या गोठ्याला ११ ऑगस्ट च्या मध्यरात्रीनंतररात्री लागलेल्या आगीत एक बैल ठार तर पाच बैल जखमी झाले. तसेच गुरांचा चारा व शेती उपयोगी वस्तू आगीच्या भक्षस्थानी पडल्या, या पिढीत शेतकऱ्यांना सामाजिक कार्यकर्ते   सुरेंद्र जी देठे व समीर देठे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतुन आर्थिक मदत करू अशी ग्वाही दिली.
वरोरा तालुक्यातील पाचगाव (ठाकरे) येथे रविवार दि.११ ऑगस्ट रोजी मध्यरात्रीनंतर गोठ्याला आग लागून एका बैलाचा मृत्यू व पाच बैल जखमी, तसेच शेती उपयोगी वस्तू जळून खाक झाल्याची घटना आज सोमवार दि.१३ ऑगस्ट रोजी पहाटे उघडकीस आली. गोठ्यात पेटवलेल्या शेकोटी मुळे ही आग लागल्याचे म्हटले जाते. या आगीमुळे गोठ्यात बांधलेल्या वासुदेव सीताराम शेंडे यांचे बैल जखमी झाले. तर जनार्धन सीताराम शेंडे यांचा एक बैल मूत्यू झाला. तर दोन्ही शेतकऱ्यांची काही जनावरे जखमी झाली.

या आगीमध्ये जनावराचा चारा व शेती उपयोगी वस्तू पूर्णपणे जळून खाक झाले. मृतक बैलाची किंमत अंदाज ५० हजार तर गुरांचा चाळीस हजार रुपयांचा चारा आणि ५० हजार रुपयांच्या शेती उपयोगी वस्तू या आगीच्या भक्षस्थानी पडले असल्याचे म्हटले जाते.
 
सदर घटनेची माहिती मिडताच तात्काळ  सामाजिक कार्यकरते श्री. सुरेंद्रजी देठे, समीर देठे, सचिन भोयर, अनिकेत झिले, निखिल तिखट, मिलिंद भोयर, नीलकंठ आमटे, बाळकृष्ण जीवतोडे,नीलकंठ झाडे व पाचगाव या गावातील समस्त गावकरी उपस्तित होते..


Comments