प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

*जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने 23 ऑगस्ट रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन* *विद्यार्थांना मिळणार प्रशिक्षणार्थी नेमणूक**मोठ्या संख्यने उपस्थित राहण्याचे आवाहन*

*जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने 23 ऑगस्ट रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन* 

*विद्यार्थांना मिळणार प्रशिक्षणार्थी नेमणूक*
*मोठ्या संख्यने उपस्थित राहण्याचे आवाहन* 

अकूंश अवथे चंद्रपूर 


चंद्रपूर, दि. 20 : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थीना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय/ निमशासकीय आस्थापना, खाजगी / सार्वजनिक क्षेत्रातील उदयोग, सहकारी संस्था, सामाजिक संस्था, सेवा क्षेत्रांतर्गत खाजगी / सार्वजनिक आस्थापना/ कंपन्या/ उपक्रम / संस्था येथे प्रशिक्षणार्थी म्हणून नेमणूक देण्यात येणार आहे.
चंद्रपूर जिल्हयातील पात्र उमेदवारांना प्रशिक्षणार्थी म्हणून नेमणूक देण्याकरीता 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

त्यामध्ये शैक्षणिक पात्रतेनुसार 1) 12 वी पास विद्यार्थांना प्रतिमाह विद्यावेतन  6 हजार रुपये, 2) आय टि आय / पदवीधर प्रतिमाह विद्यावेतन 8 हजार तर 3) पदवीधर / पदव्युत्तर विद्यार्थांना प्रतिमाह 10 हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार  आहे.
करीता 12 वी पास, आय टी आय, कोणत्याही शाखेची पदवीका कोणत्याही शाखेचा पदविधर / पदव्युत्तर उमेदवारानी त्यांचे शैक्षणिक पात्रता सिध्द करणा-या मुळ प्रमाणपत्रासह वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 

Comments