कुसुंबी व नोकारी येथे प्रत्यक्ष पाहणी करून होणार मोजणी योग्य मार्ग काढण्यासाठी जिल्हाधिका-यांच्या दालनात सकारात्मक बैठक,शेतकरी व माणिकगड कंपनीच्या अधिका-यांची उपस्थिती

कुसुंबी व नोकारी येथे प्रत्यक्ष पाहणी करून होणार मोजणी  योग्य मार्ग काढण्यासाठी जिल्हाधिका-यांच्या दालनात सकारात्मक बैठक शेतकरी व माणिकगड कंपनीच्या अधिका-यांची उपस्थिती चंद्रपूर, दि. 29 : अल्ट्राटेक सिमेंट कंपनी (माणिकगड सिमेंट) क्षेत्रातील जमिनीच्या संदर्भात बांबेझरी, कुसुंबी आणि नोकारी येथील शेतक-यांनी मांडलेल्या विषयावर जिल्हा प्रशासन गांभीर्याने आणि संवेदनशीलतेने तोडगा काढत आहे. या संदर्भात बुधवारी (दि. 29) जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या अध्यक्षतेखाली गावातील शेतकरी तसेच माणिकगड सिमेंट कंपनीच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेण्यात आली. विशेष म्हणजे कुसुंबी आणि नोकारी येथे प्रशासनाचे अधिकारी, शेतकरी आणि कंपनीच्या प्रतिनधींसमोर जमिनीची मोजणी करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी पंत यांनी स्पष्ट केले. यावर उपस्थित शेतक-यांनी समाधान व्यक्त केले. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, राजुराचे उपविभागीय अधिकारी रविंद्र माने, उपजिल्हाधिकारी (जमीन) सचिन कुमावत, भुमी अभिलेख जिल्हा अधिक्षक प्रदीप जगताप, तहसीलदार ओमप्रकाश गोंड ( राजुरा), रुपाली ...

*चरूर, पारोधी गावात पुराचे पाणी शिरले**पोल्ट्री फार्म मधील कोंबड्या गेल्या वाहून*

*चरूर, पारोधी गावात पुराचे पाणी शिरले*

*पोल्ट्री फार्म मधील कोंबड्या गेल्या वाहून*

अतुल कोल्हे भद्रावती :-
               दिनांक १९ रोज शुक्रवारला पहाटे चार वाजता पासून सुरू झालेल्या  मुसळधार पावसामुळे तालुक्यातील चरूर व पारोधी गावात पूरस्थिती निर्माण झाली असून या दोन्ही गावातील अनेक भागात पुराचे पाणी शिरल्याने या दोन्ही गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. चरूर गाव परिसरात असलेल्या एका पोल्ट्री फार्ममध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे या फार्म मधील जवळपास दोन हजार कोंबड्या वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या पूर परिस्थितीची माहिती भद्रावती तहसील प्रशासनाला देण्यात आली आहे. आज पहाटे चार वाजता पासून या परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली.पावसाचा जोर इतका मोठा होता की अल्पावधीतच या दोन्ही गावा लगतच्या नाल्याला मोठा पूर आला. सदर पुराचे पाणी चरूर व पारोधी गावात शिरले.त्यामुळे ही दोन्ही गावे अर्धी अधिक जलमय झालेली आहेत. गावातील अंगणवाडी, शाळा तथा गावातील अनेक घरात पुराचे पाणी शिरल्याने या दोन्ही गावातील जनजीवन विस्कळीत झाले असून शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे.

Comments