खाकीची मान उंचावली! पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा भव्य सत्कार: पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला

खाकीची मान उंचावली! पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा भव्य सत्कार  पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला बातमी: वरोरा 16/4/26 वरोरा : १४ एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीच्या उत्सवी वातावरणात आंबेडकर चौक, वरोरा येथे अचानक आग लागल्याची घटना घडली. या गंभीर प्रसंगी सहाय्यक  पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांनी विलक्षण तत्परता आणि धाडस दाखवत स्वतः पुढाकार घेत, आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. त्यांच्या या वेगवान व धैर्यशील कृतीमुळे मोठा अनर्थ टळला. या पराक्रमाची दखल घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, वरोरा तर्फे पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना पुष्पगुच्छ, शाल व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. शरद भस्मे यांच्या कार्यामुळे ‘खाकी’ वर्दीवरील विश्वास अधिक दृढ झाला असून, त्यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. संकटसमयी दाखवलेली त्यांची जबाबदारी, तत्परता आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी ही इतरांसाठी प्रेरणादायी ठरते. “संकटाच्या वेळी धावून येणारी खाकीच खरी जनतेची ताकद आहे,” याचे उत्तम उदाहरण म्हणजे शरद भस्मे य...

*चरूर, पारोधी गावात पुराचे पाणी शिरले**पोल्ट्री फार्म मधील कोंबड्या गेल्या वाहून*

*चरूर, पारोधी गावात पुराचे पाणी शिरले*

*पोल्ट्री फार्म मधील कोंबड्या गेल्या वाहून*

अतुल कोल्हे भद्रावती :-
               दिनांक १९ रोज शुक्रवारला पहाटे चार वाजता पासून सुरू झालेल्या  मुसळधार पावसामुळे तालुक्यातील चरूर व पारोधी गावात पूरस्थिती निर्माण झाली असून या दोन्ही गावातील अनेक भागात पुराचे पाणी शिरल्याने या दोन्ही गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. चरूर गाव परिसरात असलेल्या एका पोल्ट्री फार्ममध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे या फार्म मधील जवळपास दोन हजार कोंबड्या वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या पूर परिस्थितीची माहिती भद्रावती तहसील प्रशासनाला देण्यात आली आहे. आज पहाटे चार वाजता पासून या परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली.पावसाचा जोर इतका मोठा होता की अल्पावधीतच या दोन्ही गावा लगतच्या नाल्याला मोठा पूर आला. सदर पुराचे पाणी चरूर व पारोधी गावात शिरले.त्यामुळे ही दोन्ही गावे अर्धी अधिक जलमय झालेली आहेत. गावातील अंगणवाडी, शाळा तथा गावातील अनेक घरात पुराचे पाणी शिरल्याने या दोन्ही गावातील जनजीवन विस्कळीत झाले असून शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे.

Comments