प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

टेमुर्डा ते जामणी डांबर रस्त्याची गुणवत्ता तपासावी.

टेमुर्डा ते जामणी डांबर रस्त्याची गुणवत्ता तपासावी. 

वरोरा 30/6/24
चेतन लुतडे 

 वरोरा तालुक्यातील टेंमूर्डा गावाजवळील महामार्गालगत प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत  जामणी गावापर्यंत डांबर रस्ता बनवण्याचे काम सुरू आहे. हे काम पाहण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे व त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी गेले असता या रोड वरचे नवीन डांबरीकरण केलेले रस्त्यावरचे आवरण हाताने निघत असल्याचे निदर्शनास आले. यानंतर या ठिकाणी वापरण्यात येणारे क्रश हे निकृष्ट दर्जाची असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे येणाऱ्या पहिल्याच पावसात हा रोड वाहून जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे संबंधित विभागाला या रस्त्याची पाहणी करून त्वरित ठेकेदाराचे पुढील पेमेंट थांबावे अशी मागणी किशोर डुकरे यांनी केली आहे. 

पावसाळ्यात हा रोड वाहून गेल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी  संबंधित विभागाच्या इंजिनीयर व देखरेख करणारे कर्मचारी व ठेकेदार यांच्या खिशातून शासनाचे पैसे भरून द्यावे. अन्यथा आम्ही आंदोलन करू अशी भूमिका किशोर डुकरे यांनी घेतली आहे.
जामणी या गावपर्यंत रोड जाणार आहे. या संबंधात गावकरी सुद्धा आक्रमक झाले असून या रोडची गुणवत्ता तपासणी करण्यात यावी अशी मागणी करत आहे.


Comments