पर्यावरण समितीचे रेती प्रकल्पावर दुर्लक्ष. जीपीएस, सीसीटीव्ही आणि हेल्पलाइनची चेक करण्याची व्यवस्था कुचकामी ठरत आहे.

पर्यावरण समितीचे रेती प्रकल्पावर दुर्लक्ष.  जीपीएस, सीसीटीव्ही आणि हेल्पलाइनची चेक करण्याची व्यवस्था कुचकामी ठरत आहे. वरोरा /चेतन लूतडे:  वनी-मारेगाव तालुक्यातील वाळू घाटात अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याची टीका नागरिकांनी केली आहे. नागरिकाने रेती घाटांवरील नियमावली आणि देखरेखीच्या प्रश्नावरुन प्रमुख मुद्दे उपस्थित केले आहे . सद्यस्थितीत  वाहनांवर ट्रॅकिंग डिव्हाइस ( जीपीएस) बसविण्यात आले असले तरी, घाटामधून स्टॉक वर ही रेती वाहतूक केली जाते त्या वाहनावर जीपीएस नाही. आणि एकाच टिपी वर दिवसभर ही वाहतूक यवतमाळ जिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्यात करण्यात येत आहे. घाटाचे ठिकाण ते सगळ्यात दूरचे ठिकाण अशी टीपी फाडून दिवसभर चालवली जाते. वर्धा नदी आपटी घाट पात्रातून  दिवस रात्र वाळू उपसा करून स्टॉक जेवढा होता तेवढाच केला जात असल्याचे सांगितले जाते. अधिकारी तपासण्यासाठी जरी आले तरी तो स्टॉक दिलेल्या माहितीपेक्षा  थोडा कमी करून दाखवल्या जातो.  ग्रामपंचायत आपटी  ग्रामसेवकांना याबाबत विचारले असता त्यांना कोणताही लेखी आदेश आलेला नाही त्यामुळे आमच्याजवळ कोणतीह...

लघु पाटबंधारे विभाग भटाळा तलाव फुटण्याच्या मार्गांवर संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज

लघु पाटबंधारे विभाग भटाळा तलाव फुटण्याच्या मार्गांवर 

संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज 

वरोरा
चेतन लुतडे 

 वरोरा तालुक्यातील लघु पाटबंधारे विभाग चंद्रपूर शाखा वरोरा यांच्यावतीने कोटबाळा भटाळा, खेमजई या तिन्ही गावच्या मधोमध लघु पाटबंधारे विभाग भटाळा नावाने  40 वर्षा अगोदर तलाव बांधण्यात आले आहे.
 या तलावाची अजून पर्यंत कुठलीच दुरुस्ती करण्यात आली नसल्याने  तलावाचे बांधकाम पूर्णपणे जीर्ण झाले आहे.
 सततच्या पावसामुळे या ठिकाणी भोगदा पडला असून बराच पाण्याचा विसर्ग यामधून होत आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास लवकरच जीर्ण झालेली जमिन फुटण्याच्या मार्गावर आहे, या तलावात गेट नसून, फॉल आहे फॉलची भिंत कोसळली असून  संबंधित अधिकारी यांनी या तलावाची पाहणी करून डाकडुजी करण्याचा प्रयत्न करत आहे,
 

लघु पाटबंधारे विभाग यांनी तयार केलेल्या तलाव दुरुस्ती साठी ग्रामपंचायत भटाळा तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्या कडून वारंवार तक्रारी दिल्या मात्र अधिकारी उदासीन असल्यामुळे आज शेतकरी यांना मोठा फटका बसण्याची वेळ आली आहे,तसेच तलाव फुटल्यास शेतपिकाची झालेली नुस्कान भरपाई सिंचन विभागाने दयावी आणि तलावाच्या पाण्याखाली येणाऱ्या रब्बी पीक सिंचाई शेतकरी यांना कामचुकार अधिकारी यांच्या वेतानातून देणात यावी अन्यथा आंदोलन करू असा इशारा शेतकर्यांनी दिला आहे . कोटबाळा, भटाळा, आसाळा, बोरगाव देश या गावातील शेतकरी यांना मोठा फटका बसेल अशी सामाजिक कार्यकर्ते श्री किशोर  डुकरे यांनी वर्तवली आहे.

Comments